शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

टायर जाळून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:30 PM

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देप्रहारचे जेलभरो आंदोलन : मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली.शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी. शेतकºयांची फसवणूक करणाºया बियाणे कंपनीवर कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी. शेतीच्या पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा समावेश मनरेगा अंतर्गत करावा. घोषित झालेल्या दुष्काळग्रस्तांना दुष्काळी अनुदान द्यावे. शिवाय त्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ओबीसीसाठी स्वतंत्र घरकूल योजना करून आर्थिक तरतूद करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे. आदिवासींचे प्रलंबित वनहक्क, जमीन पट्टे त्वरित वाटप करावे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचा समावेश करण्यात यावा. कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने देण्यात यावे. नुकसानग्रस्त फळ उत्पादक शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. दुबार पेरणीधारकांना तातडीने बियाणे खते, किटकनाशके व आर्थिक मदत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन मोबदला व नौकरी द्यावी. निराधार, विधवांना दहा हजार रुपये देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर आला असता आंदोलकर्त्यांनी टायर जाळून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार नारेबाजीही करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे, रसूलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. आंदोलनात प्रितम कातकिडे, रेवत इंगळे, दिनेश पोपळकर, मिलिंद गव्हाणे, भुषण येलेकार, आदित्या कोकडवार, हनुमंत झोटींग, धनराज घुमे आदी सहभागी झाले होते.उपजिल्हाधिकाऱ्यांना धरले धारेवरवर्धा जिल्ह्यातील किती गाव, किती महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय त्यासाठी किती निधीची मागणी असून तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला काय, अशी विचारणा करीत आ. बच्चू कडू यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना चांगलेच धारेवर धरले होते. ज्यानंतर बनकर यांनी तातडीने संबंधित अधिकारी अतुल रासपायले यांना बोलाविले. त्यांनीही वेळीच कार्यवाही न केल्याचे लक्षात येताच आ. कडू यांनी त्यांचीही कानउघाडणी केली.

टॅग्स :Morchaमोर्चा