शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामात पर्यटकांना दिलासा, आश्रम प्रतिष्ठानने वेळ वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:37 IST

४५ मिनिटे मिळणार अतिरिक्त : मंगळवारपासून नियमावली लागू

दिलीप चव्हाण

सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्रम प्रतिष्ठानने सुरक्षा व तांत्रिक अडचणींमुळे १ जानेवारी २०२१ रोजी आश्रमाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केली होती. मात्र, आता ही वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. मंगळवारपासून सकाळी आठ ते सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत पर्यटकांना आश्रमात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींचा आश्रम हा जगात प्रसिद्ध आहे. ही गांधीजींची कर्मभूमी राहिली असून स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. आश्रम नियमांवर आधारित आणि सार्वजनिक राहिल्याने याला एक वेगळे महत्त्व आहे. श्रमदान, सूतकताई, रचनात्मक कार्य, प्रार्थना हा आश्रमाचा पाया आहे. प्रार्थना प्रात:वेळी आणि सायंकाळी होत असून सायंकाळची प्रार्थना मात्र निळ्या आभाळाखाली होते.

गांधीजींनी आपल्या जीवनात प्रार्थनेला खूप महत्त्व दिलेले होते. देश- विदेशातील पर्यटक, दर्शनार्थी आणि अभ्यासक तसेच अति महत्त्वाच्या व्यक्ती येथे भेट देण्यासाठी येतात. वास्तविकत: जुनी वेळ ही सूर्योदय ते सूर्यास्त अशी होती. उशिरा येणाऱ्या लोकांना प्रवेशद्वार बंद झाल्याचे पाहून परत जावे लागायचे. वेळ वाढविला तर बरे होईल, असा विचार पुढे आला आणि मंगळवारी यावर शिक्कामोर्तब झाले. फलकांवर तसा बदलही करण्यात आला असून वाढीव वेळेचा पर्यटकांनाही फायदा होत आहे.

वर्षभरात सव्वादोन लाख पर्यटकांची भेट

सेवाग्राम आश्रमात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दाेन लाख २६ हजार ३५५ दर्शनार्थींनी भेटी दिलेल्या आहेत. वास्तविक यापेक्षाही जास्त पर्यटक येऊन गेले असून त्यांनी नोंदी केलेल्या नाहीत. अनेक पर्यटक येतात; पण नाेंदी न करताच निघून जातात. आश्रमाला गांधीजींच्या नात सुमित्रा गांधी- कुळकर्णी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शशी थरूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फिजीचे राष्ट्रदूत कमलेश स्वरूप इत्यादींनी भेटी दिलेल्या आहेत.उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक लोक उशिरा येतात. वेळ संपल्याने त्यांना परत जावे लागत असल्याने वेळ वाढवून दिलेला आहे. दर्शनार्थींनी वेळेचे भान ठेवून सहकार्य करावे.

- आशा बोथरा, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान

आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने वेळ वाढविण्यात आल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधाजनक झालेले आहे. सध्या उन्हामुळे सकाळी आणि सायंकाळी पर्यटक आश्रमाला भेट देऊ शकतात.

- जयश्री पंडित, पर्यटक, बंगळुरू

टॅग्स :Sewagramसेवाग्रामwardha-acवर्धा