शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

चौपदरीकरणाचे अंतर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 11:28 PM

नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षांना निवेदन : व्यापारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे. या रस्त्याची नियोजित ३० मिटरची लांबी २० मिटर करावी, अशी मागणी आर्वीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आर्वी-तळेगाव हा रस्ता राष्ट्रीय राज्य मार्गाकडे चारपदरी रस्ता बनविण्यासाठी हस्तांतरीत केला आहे. हा रस्ता आर्वीतील मुख्य रहदारीच्या ठिकाणाहून जात असल्याने आर्वी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणात तोडल्या जाण्याची शक्यता आहे. गत ५० वर्षांपासून हे दुकानदार लिजवर दिलेल्या जागेवर साहित्य विक्रीकरून कुटुंबाचे पालन पोषण करतात. त्यांची दुकाने हटविल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून रस्त्याच्या चौपदरीकरण करताना ते २० मिटर इतकेच करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना निवेदन सादर करताना यावेळी सुनील कटियारी डॉ. प्रकाश राठी, खलील भाई, मदन शिंदे, शेख जाबीर, सुनील खिलोसिया, विजू गहलोत, रवी निंबाळकर, मोटवानी आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. आर्वीतील शिवाजी चौकातून हा चौपदरीकरणाचा मार्ग जाणार असल्याने शहरातून हा मार्ग दोनपदरी करावा. तसेच आर्वी शहरातील लिजवर दिलेल्या दुकानांची मुदत २०३० पर्यंत असल्याने या मार्गावर चौपदरीकरण रस्त्याचे अंतर २० मिटर ठेवण्याची मागणी केली आहे.