शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची वाट पाहतेय लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० वाजता आष्टी साठी बस सोडली जाते. त्यानंतर दर एक तासाने बसचे शेड्युल असून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बसगाडी नाही.

ठळक मुद्देप्रवाशांतही भितीचे वातावरण : आर्वीच्या बसस्थानकातील वास्तव

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : कोरोणा विषाणूचा प्रादुभार्वावर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्यातरी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरीला जिल्ह्यांतर्गत फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र लालपरीची प्रवाशांनी धास्ती घेतल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अत्यल्प प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू आहे ५५ प्रवाशाची क्षमता असलेल्या बसमध्ये केवळ ५ ते ७ प्रवासी असल्याने बसमधील सोशल डिस्टन्सिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० वाजता आष्टी साठी बस सोडली जाते. त्यानंतर दर एक तासाने बसचे शेड्युल असून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बसगाडी नाही. ७ शेड्युलमध्ये १४ चालक वाहक आहे दररोज सात ते आठ हजार किलोमीटरचा प्रवास सध्या या बसेस करतात या सात बसेसचे उत्पन्न किमान तीस हजार दररोज अपेक्षित आहे. मात्र दररोज सात ते आठ हजार रुपयाची आवक असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांचा पगार ही यात निघत नाही. सध्या २० ते ३० च्या दरम्यान लोड फॅक्टर आहे. हा ५० ते ६० च्या दरम्यान असावयास पाहिजे होता. मंगळवारी २०० प्रवासी तर बुधवारी १९२ प्रवाशांनी या मार्गावर जाणे-येणे केल्याची नोंद आहेआर्वी आगारात ९६ चालक ९६ वाहक आहे तर २३ चालक-वाहक (टू-इन-वन) आहे २३ मेकॅनिकल आणि १२ कार्यालयीन स्टॉप तर आठ वाहतूक नियंत्रक आहेत. आगार व्यवस्थापक व वाहतूक निरीक्षक आणि इतर असे एकूण २६१ कार्यरत कर्मचारी आर्वी आगारात कार्यरत आहेत. या आगारात ४४ बसेस असून दररोज १९ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास या बसेस करीत होत्या. साधारणत दररोज साडेपाच ते सहा लाख रुपये उत्पन्न होते. उन्हाळ्याच्या दिवसात विवाह सोहळ्याचे ९ ते १० लाखाचे उत्पन्न दरवर्षी होते आणि इतर उत्पन्न स्त्रोत वेगळेच होते मात्र आता कोरोणाच्या प्रादुभार्वाने विवाह सोहळे लॉकडाऊन झाले आहे तेरावी चौदावी , बारसे मुंज, साक्षगंध आदी विविध कार्यक्रम समारंभ, पाहूनपण ,सर्वच लॉकडाऊन झाल्याने प्रवाशांची ये-जा थांबली आहे. त्यामुळे फार मोठा फटका लाल परीच्या आर्थिक व्यवहारावर पडल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.सध्या आर्वी वर्धा, आणि आर्वी आष्टी या मार्गावर सात शेडूल सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू आहे तसेच दररोज बसेस अल्टरनेट केल्या जातात मंगळवारी २२२ प्रवासी तर बुधवारी १९३ प्रवाशांची ये-जा होती लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्यापासून तर सर्वच कार्य स्थगित असल्याने त्याचा परिणाम प्रवाशावर झाला आहे. तर परिणामी आर्वी आगारचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले आहे.- विनोद खंडार, वाहतूक निरीक्षक, आर्वी

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या