शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

३० गावांच्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील ‘त्या’ नोंदी कायमच

By admin | Updated: January 24, 2015 01:36 IST

निम्न वर्धा पाटबंधारे प्रकल्पासाठी वर्धा जिल्ह्यातील २२७ गावाच्या शेतजमिनीचे अधिग्रहण केले होते.

वर्धा : निम्न वर्धा पाटबंधारे प्रकल्पासाठी वर्धा जिल्ह्यातील २२७ गावाच्या शेतजमिनीचे अधिग्रहण केले होते. यापैकी केवळ ३० गावांच्या जमिनीचा निर्बंध कायम ठेवून १९७ गावाची जमीन पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक नसल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या सातबारावरील नोंदी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. निम्न वर्धा पाटबंधारे प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रकल्प विस्थापितांचे पुनर्वसन अधिनियम १९७६ चे कलम ११(१) अन्वये जमिनी घेण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्याची नोंद चढविण्यात आली होती. १७ डिसेंबर २०१३ रोजी निम्न वर्धा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रकल्पाच्या धरणासाठी व बुडित क्षेत्रासाठी केवळ ३० गावांची जमीन आवश्यक असून, उर्वरित गावांच्या जमिनीची आवश्यकता नसल्याने, १९७ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील निर्बंध हटविण्यात यावे, अशा सूचना केल्या. यासंदर्भात ११ जून २०१४ रोजी शासनाने संबंधित विभागाला आदेश दिले होते. यानुसार जमिनीची विक्री, विभाजन, पोटविभागणी, रूपांतरण किंवा सुधारणा यावरील निर्बंध उठविण्याच्या संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या; मात्र अद्यापही १९७ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सातबारावरील नोंदी काढण्यात आल्या नाही. शेतकऱ्यांना यासाठी संबंधित गावाच्या तलाठ्याकडे जावे लागते. नियमानुसार तलाठ्यांनी सातबाऱ्यावरील नोंद काढणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना खटाटोप करावा लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)