शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल प्राप्त; बाधित नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आहे. प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास या संकटातून सुखरुप बाहेर पडता येईल.

ठळक मुद्देप्रयोगशाळेत पाठविलेले नऊही अहवाल निगेटिव्ह : सतर्कता हाच या आजारावर एकमेव उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा विषाणू सर्वत्र पाय पसरत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करुन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे. परिणामी आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आहे. प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास या संकटातून सुखरुप बाहेर पडता येईल.जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या नागपूर व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने वेळीच सावधगिरी बाळगून उपाययोजना सुरु केल्या. सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासह शाळा, महाविद्यालये बंद करुन प्रारंभी आपत्कालीन परिस्थिती घोषीत केली. त्यानंतर रविवारी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला. त्याला जनेतेनेही सर्वत्र उदंड प्रतिसाद दिला. मात्र, दुसऱ्या दिवशीच पुन्हा नागरिकांनी घराबाहेर पडून बेजबाबदारपणाचे दर्शन घडविले.या आजाराला सहज न घेता सजग राहण्याचे आवाहन होत असतानाही नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे विषाणूला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाने संचारबंदी लागू केली.यासोबतच जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या आहे. आता कोरोना विषाणूचा कठीण काळ सुरु झाला असून या लढाईत जिंकण्यासाठी सर्वांनी धावण्याची नाही तर घरीच थांबण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग स्वत: चा जीव धोक्यात घालून सर्वांसाठी प्रयत्नरत असताना नागरिकांनीही आपल्या सहकार्याची साथ देण्याची गरज आहे. त्याकरिता प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.बाहेरगावावरुन आलेल्यांची घरोघरी जाऊन आरोग्य विभाग करतोय तपासणी- कोरोना बाधित क्षेत्रातूर्न जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर प्रशासनाची करडी नजर आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती जिल्ह्यात आल्याची आरोग्य विभागाकडे नोंद आहे. त्यापैकी ७४ व्यक्तींची आतापर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली. उर्वरित ३५ व्यक्ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पण, त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय चमू लक्ष ठेऊन आहे. आरोग्य विभागाने प्रारंभी तीन, नंतर पाच, त्यानंतर एक असे एकूण ९ व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता पाठविले होते. या सर्वांचेच नमुने निगेटिव्ह आले आहे.- यासोबतच जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई यासह इतरही मोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या गावाकडे परत आले आहे. त्यांची आकडेवारी ग्रामपंचायत सरपंच व पोलिस पाटलांकडून घेऊन आरोग्य सेविका व वैद्यकीय अधिकारी त्यांची तपासणी करीत आहे. त्यांच्यावर १४ दिवसापर्यंत लक्ष ठेऊन आहे.आतापर्यंत तीन टप्प्यात ९ व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. त्यांनी सूचनांचे पालन करुन घराबाहेर न पडता घरातच आपला वेळ घालवावा.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या