शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आमदारांसमोर महावितरण कर्मचाऱ्यांच्या कारभाराचा वाचला पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

 थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही.  शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) या तीन गावांतील ग्रामस्थांसह सरपंचांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलनस्थळी जाऊन सरपंचांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपविभागीय अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून आश्वस्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही.  शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही. गावातील पथदिव्यांमध्ये बिघाड आल्यास ‘हे आमचे काम नाही’ असे लाईनमन सांगतो. कार्यालयात गेल्यावर कनिष्ठ अभियंता जीवतोडे व लाईनमन मानकर उडवा-उडवीची उत्तरे देतात, आदीमुळे केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच आ. डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसल्याने सेलूचे उपविभागीय अभियंता मनोज खोडे यांना बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीतच ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. आमगाव (खडकी) तील इंदिरानगर व नवरगाव (पुनर्वसन) येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील वीज जोडणी गावठाणच्या फिडरवर नसल्याने या गावात नियमित पाणीपुरवठा करताना अडचणी येतात. गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याचे वारंवार ग्रामस्थांनी कळविले. गावठाण फिडरवर जोडणी करण्याची मागणीही केली पण, दखल घेतली नाही. त्यामुळे कनिष्ठ अभियंता व लाईनमनची बदली करण्याची मागणी रेटून धरली. अखेर उपविभागीय अभियंता खोडे यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने रोष निवळला. यावेळी केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, उपसरपंच सुनील धुमोने,आमगावच्या सरपंच नंदा मंगाम, नवरगावचे सरपंच संजय गजांम, जि. प. सदस्य विनोद लाखे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विजय खोडे, फारुख शेख, कृष्णा वाकडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरmahavitaranमहावितरण