शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची कोसळधार; जलाशयांच्या पातळीत वाढ, नदी-नाल्यांना पूर आल्याने सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:31 IST

प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग : जिल्ह्यात पूरस्थिती

वर्धा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सर्वत्र कोसळधार असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जलाशयांच्या पाणीपातळी वाढ झाल्याने पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. परिणामी नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली असून, सकाळपासूनच धो-धो बरसायला लागला आहे. यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची कामेही थांबली आहे. बऱ्याच भागात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. तसेच शेतशिवारही या पुराच्या पाण्याने खरडून जाण्याच्या स्थितीत आहे. हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस असल्याने या तालुक्यातील बऱ्याच भागातील गावांचा संपर्क तुटला. पोहणा, ढिवरी-पिपरी, कुंभी-सातेफळ, अलमडोह-अल्लीपूर या मार्गावरून पाणी वाहून जात असल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. याशिवाय सास्ती, कोसुर्ला व भैयापूर शिवारातही पाणी शिरल्याने परिसर जलमय झाला आहे.

उर्ध्व वर्धानंतर निम्नतूनही सोडले पाणी

उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने ९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या सात दरवाजांतून ५० से.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातील पाणी निम्न वर्धा प्रकल्पात येत असल्याने याही प्रकल्पातील पाणीसाठा वाढायला लागल्याने रात्री साडेआठ वाजता या प्रकल्पाची १३ दरवाजे उघडण्यात आली. यातून ३३७.२ घनमीटर पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

लाल नाला प्रकपाचे पाच गेट उघडले

कोरा : या परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात पाऊस असल्याने येथील लाल नाला प्रकल्प शत-प्रतिशत भरले आहे. परिणामी या प्रकल्पाच्या पाच गेटमधून पाच सेंटिमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला. आज कोरा येथे आठवडी बाजार असल्याने सर्वत्र दाणादाण झाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चापापूरला जाण्याकरिता दोन नाले ओलांडून जावे लागतात. या नाल्यावरील पुलांची उंची फारच कमी असल्याने पूर आला की मोठी पंचाईत होते. आजही शेतकरी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तीन वर्षांपूर्वी शेतकरी व मजूर या पुलावरून वाहून गेले होते. सुदैवाने दोघेही बचावले; परंतु या पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोहरा परिसरातील शेतशिवार झाले जलमय

पोहणा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके खरडून गेली आहे. पुलावरून पाणी असल्याने वेणी, बोपापूर व हिवरा या गावाला जोडणारे मार्ग बंद पडले. गावातील नाल्यांची स्वच्छता केली नसल्याने नाल्यातील पाणी रस्त्यांवरून वाहायला लागले. त्यामुळे बोपापूर येथील नवीन वसाहतीमध्ये अनेकांच्या घरांत पाणी शिरले. कूपनलिका पाण्याखाली आल्याने गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरwardha-acवर्धा