शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

रेल्वे उड्डाणपुलाचे काम थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देफाटक राहते नेहमी बंद : समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : येथील राष्ट्रीय मार्ग अनेकदा दुरूस्तीचे काम हाती घेतल्यानंतर गुळगुळीत करण्यात आला. परंतु, वाहनचालकांसाठी सर्वात मोठी समस्या ठरु पाहणाऱ्या पुलगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाची समस्या जैसे थे असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणार आहेत.असे असले तरी पुलगाव येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे फाटक नेहमीच बंद राहत असल्याने तेथे वाहतुकीची कोंडी होते. रेल्वे उड्डाण पुलासाठी एक-दोन कोटी नव्हे तर तब्बल ४५ कोटी मंजूर झाले आहेत. असे असले तरी मागील सात वर्षांपासून काम कासवगतीनेच केले जात आहे. त्यामुळे पुलगाव येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.खासदारांच्या प्रयत्नाअंती २१ पिलर्स उभेउड्डाणपूलाचा प्रश्न रेंगाळत असल्याचे लक्षात येताच खा. रामदास तडस यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर उड्डाण पुलाच्या ३४ पिलर्स पैकी २१ पिलर्सचे काम सुरू झाले. शिवाय नाल्यावर दोन पुलही बांधण्यात आले. नाचणगाव रोड ते पंचधारा मार्गाचे दोन्ही बाजूने रूंदीकरण करून खडीकरणही करण्यात आले. पण सध्या हे काम बंद आहे.४५ कोटींचा निधी मंजूरवाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन राज्य व केंद्र शासनाने ६५६ मिटर लांबी व १२ मिटर रूंदी असलेल्या तीन पदरी मार्गाला मान्यता दिली. तसेच राज्य शासनाचे ३५ कोटी व रेल्वे विभागाचे १० कोटी असे ४५ कोटींचा निधी उड्डाणपुलासाठी मंजूर झाला. रेल्वे विभागाचे तीन पिलर्स मिळून एकूण ३४ पिलर्सवर हा उड्डाणपुल उभा राहणार आहे.रणजीत कांबळेंनी केले भूमिपूजननियोजन प्रकरण क्र. ६७९/नियोजन-३ २७ मे २०१४ अन्वये राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देवून बांधकामाच्या निविदाही काढल्या. जून २०१४ मध्ये पुरवणी अर्थ संकल्पात नव्याने समाविष्ठ करून आर्थिक तरतूदही करण्यात आली. इतकेच नव्हे तर तत्कालीन मंत्री तथा विद्यमान आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते आॅगस्ट २०१४ मध्ये भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण झाला. मात्र, उड्डाण पुलाचे काम कासवगतीनेच होत आहे.मुख्य कंत्राटदार व सह कंत्राटदार यांच्यात वाद झाल्यामुळे कंत्राटदाराने काम सोडल्याचे आणि त्याचा परिणाम या उड्डाण पुलाच्या बांधकामावर झाल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात. इतकेच नव्हे तर गुजरात येथील दुसऱ्या कंपनीच्या साझ्याने काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. बांधकाम विभागाने उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्णत्त्वास नेले पाहिजे. शिवाय कामात हयगय करणाºया कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे.- रामदास तडस, खासदार, वर्धा.

टॅग्स :railwayरेल्वे