शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हजसाठीचा कोटा 70 वरून 90 टक्के व्हावा, जमाल सिद्दिकींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 17:38 IST

जमाल सिद्दीकी : यंदा हज यात्रेला दोन लाख लोक जाणार

वर्धा : हज यात्रेसाठी सर्वात जास्त यात्रेकरू पाठविणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिला क्रमांक इंडोनेशीयाचा आहे. भारतातून गतवर्षी 1 लाख 75 हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला गेले होते. तर यावर्षी सुमारे 2 लाख मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार आहे. हज समितीच्या कोट्यातून सदर यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता हज समितीचा कोटा 70 वरून 90 टक्के करण्यात यावा, अशी मागणी हज समितीचे राज्याध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

ना. जमाल सिद्दिकी पुढे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातून 64 इच्छुकांनी हज यात्रेला जाण्यासाठी आवेदन केले आहे. त्यापैकी 48 मुस्लिम बांधव यंदा हज यात्रेसाठी जाणार आहे. तर महाराष्ट्राचा विचार केल्यास हा आकडा 16 हजार इतका आहे. राज्यातून यंदा 35 हजार 711 अर्ज प्राप्त झाले आहेत. मोदी सरकारने हज जाणाऱ्यांच्या कोट्यात 25 टक्क्यांनी वाढ केल्याने याचा प्रत्यक्ष लाभ मुस्लिम बांधवांना होत आहे. यंदा 14 जुलैपासून हज यात्रेकरू त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातील हज यात्रेसाठी जाऊ इच्छीणारे मुस्लीम बांधव आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबाद आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई व उपराजधानी असलेल्या नागपूर तसेच औरंगाबाद येथून पुढील प्रवासासाठी जाणार आहे. 

हज यात्रेकरूंना सुविधा मिळावी या हेतुने जिल्हा स्तरावर लवकरच समितींचे गठण होणार आहे. या समितीत अध्यक्ष, उपाध्यक्षासह एकूण 11 सदस्य राहणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सुमारे 30 हाजी दोस्त नियुक्त केले जाणार आहेत. सद्यस्थितीत हज समितीच्या माध्यमातून हज यात्रेसाठी जाणाऱ्यांना सुमारे दोन ते अडीच लाखांचा खर्च येतो. याशिवाय खासगी कंपन्या चार ते साडेचार लाखांमध्ये मुस्लीम बांधवांना हज यात्रा घडवते. हज यात्रेवरील खर्च कमी व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाण्यातील जहाजाचा वापर हज यात्रेसाठी कसा करता येईल, यासाठी सध्या विशेष प्रयत्न होत आहेत. हज यात्रेकरूंची कुठल्याही पद्धतीने फसवणूक होऊ नये म्हणून एच.ओ.जी. नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून त्यावर अधिकृत एजन्सींची माहिती आहे. शिवाय हजसाठी गेलेल्यांना सुविधा व्हावी म्हणून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असून तो त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहे. कुठलीही खासगी कंपनी हज यात्रेकरूंना करारानुसार सुविधा पुरवित नसेल तर त्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासारखी कठोर कारवाई केल्या जाणार असल्याचेही यावेळी ना. जमाल सिद्दिकी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला फैय्याझ खान, बिस्मील्ला खान, रहीम हाजी, फारूक भाई, तौफिक नुरानी आदींची उपस्थिती होती.

डॉलरची किंमत वाढल्याने हजचा खर्च वाढलाडॉलरची किंमत वाढल्याने हज यात्रेचा खर्च वाढला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात सबसीडी दिल्या जात असे. त्याचा प्रत्यक्ष फायदा केवळ एअर लाईन कंपन्यांना मिळत होता. हाजींनी सरकारचा एक रुपया घेतला नसून उलट ते देत आहेत. मुस्लिम बांधव कुणाच्या पैशावर हजला जात नाही. मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळात मुस्लिम बांधवांच्या माथी असलेला कलंक पूसला आहे, असेही यावेळी ना. जमाल सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.

हिंदी विश्व विद्यालयास भेटजमाल सिद्दीकी यांनी वर्ध्यातील महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाला सदिच्‍छा भेट दिली. यावेळी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी त्‍यांचे शॉल आणि स्‍मृतिचिन्‍ह देवून स्‍वागत केले. याप्रसंगी कार्यकारी कुलसचिव प्रो. कृष्‍ण कुमार सिंह, हिंदी अधिकारी राजेश कुमार यादव प्रामुख्‍याने उपस्थित होते. कुलगुरु प्रो. शुक्‍ल यांनी शैक्षणिक कामकाजांची माहिती दिली. जमाल सिद्दीकी यांनी विश्‍वविद्यालयाच्‍या कार्याची प्रशंसा केली. विश्‍वविद्यालय वर्धेत असल्‍याने त्‍याचा लाभ आसपासाच्‍या भागातील विद्यार्थ्‍यांना होत असल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. 

टॅग्स :Haj yatraहज यात्राwardha-pcवर्धाMuslimमुस्लीम