शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीतही ‘पुष्पा’; म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे परंतु तीनच घाटधारकांनी पूर्ण रक्कम भरली आहे. विशेषत: लिलावानंतरही लिलाव झालेल्या आणि न झालेल्या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा चालतात. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा हस्तक्षेपही वाढला आहे. 

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या‘पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. वर्धातही काहींनी वाळूतस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली असून सध्या त्यांच्यावरही ‘पुष्पा’चे गारुड आहे. रात्रभर अवैधरित्या उपसा करून ‘आपला नाद करायचा नाय, आमच्या वाट्याला जाल तर खबरदार, आपलं एकच काम भरा रेती, करा खाली’ असे स्टेटस मोबाइलवर पहावयास मिळत असल्याने, त्यांनी ‘प्रशासनासमोर झुकेगा नही साला’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे परंतु तीनच घाटधारकांनी पूर्ण रक्कम भरली आहे. विशेषत: लिलावानंतरही लिलाव झालेल्या आणि न झालेल्या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा चालतात. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा हस्तक्षेपही वाढला आहे. यासोबतच राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करताना अधिकाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून कारवाईला न घाबरता महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर ‘झुकेगा नही साला’ अशाच अविर्भावात सध्या वाळू तस्कर वावरताना दिसत आहे. 

वाळू तस्करांचा अधिकाऱ्यांवर हल्ला...-  वाळू तस्करांचा रात्रीच्या अंधारातच खेळ चालत असल्याने अधिकाऱ्यांनाही कारवाईकरिता अडचणी निर्माण होता. अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविणे, धमकाविणे आदी प्रकार इतरत्र घडतांना दिसतात. परंतु जिल्ह्यामध्ये वर्षभरात एकाच ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचे प्रकरण दाखल आहे. -  हिंगणघाट तालुक्यामध्येच अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. परंतु या अवैध वाळू व्यवसायामध्ये वर्षभरात किमान चार ते पाच मजुरांना आपला जीव गमवावा लागला. 

उत्खननाची १६६ प्रकरणे -  जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये वर्षभरात वाळू, मुरूम, दगड या गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक संदर्भात १६६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११२ प्रकरणे फक्त वाळू संदर्भातील आहे. प्रशासनाकडून ११ गुन्हे दाखल केले असून १३ आरोपींना अटक केली. तसेच याप्रकरणी ५ कोटी १९ लाख ७४ हजार ९१६ रुपयांचा दंड आकारला आहे. 

तस्करांनी वाढविले वाळूचे भाव-  जिल्हा खनिकर्म विभागाकडून दरवर्षी वाळू घाटांचा लिलाव केला जातो. परंतु घाटधारक लिलावाकडे पाठ फिरवितात. किंवा एक घाट लिलावात घेऊन लगतच्या दुसऱ्या घाटामध्ये उत्खनन करतात. -  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याने याच स्पर्धेतून सर्वसामान्यांना कमी दरात वाळू मिळणे कठीण झाले आहे. अवैधरित्या स्टॉक करून दामदुप्पट दराने विक्री केली जात असल्याची ओरड होत आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी