शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वाळू तस्करीतही ‘पुष्पा’; म्हणतोय प्रशासनासमोर झुकेगा नही साला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे परंतु तीनच घाटधारकांनी पूर्ण रक्कम भरली आहे. विशेषत: लिलावानंतरही लिलाव झालेल्या आणि न झालेल्या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा चालतात. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा हस्तक्षेपही वाढला आहे. 

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चंदन तस्करीतून मजूर ते माफिया असा प्रवास करणाऱ्या‘पुष्पा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. वर्धातही काहींनी वाळूतस्करीतून बिल्डर ते लोकप्रतिनिधी अशी मजल मारली आहे. त्यांची ही प्रगती पाहून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी वाळू तस्करी सुरू केली असून सध्या त्यांच्यावरही ‘पुष्पा’चे गारुड आहे. रात्रभर अवैधरित्या उपसा करून ‘आपला नाद करायचा नाय, आमच्या वाट्याला जाल तर खबरदार, आपलं एकच काम भरा रेती, करा खाली’ असे स्टेटस मोबाइलवर पहावयास मिळत असल्याने, त्यांनी ‘प्रशासनासमोर झुकेगा नही साला’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे परंतु तीनच घाटधारकांनी पूर्ण रक्कम भरली आहे. विशेषत: लिलावानंतरही लिलाव झालेल्या आणि न झालेल्या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा चालतात. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींचा हस्तक्षेपही वाढला आहे. यासोबतच राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करताना अधिकाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून कारवाईला न घाबरता महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर ‘झुकेगा नही साला’ अशाच अविर्भावात सध्या वाळू तस्कर वावरताना दिसत आहे. 

वाळू तस्करांचा अधिकाऱ्यांवर हल्ला...-  वाळू तस्करांचा रात्रीच्या अंधारातच खेळ चालत असल्याने अधिकाऱ्यांनाही कारवाईकरिता अडचणी निर्माण होता. अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविणे, धमकाविणे आदी प्रकार इतरत्र घडतांना दिसतात. परंतु जिल्ह्यामध्ये वर्षभरात एकाच ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचे प्रकरण दाखल आहे. -  हिंगणघाट तालुक्यामध्येच अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. परंतु या अवैध वाळू व्यवसायामध्ये वर्षभरात किमान चार ते पाच मजुरांना आपला जीव गमवावा लागला. 

उत्खननाची १६६ प्रकरणे -  जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये वर्षभरात वाळू, मुरूम, दगड या गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक संदर्भात १६६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११२ प्रकरणे फक्त वाळू संदर्भातील आहे. प्रशासनाकडून ११ गुन्हे दाखल केले असून १३ आरोपींना अटक केली. तसेच याप्रकरणी ५ कोटी १९ लाख ७४ हजार ९१६ रुपयांचा दंड आकारला आहे. 

तस्करांनी वाढविले वाळूचे भाव-  जिल्हा खनिकर्म विभागाकडून दरवर्षी वाळू घाटांचा लिलाव केला जातो. परंतु घाटधारक लिलावाकडे पाठ फिरवितात. किंवा एक घाट लिलावात घेऊन लगतच्या दुसऱ्या घाटामध्ये उत्खनन करतात. -  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याने याच स्पर्धेतून सर्वसामान्यांना कमी दरात वाळू मिळणे कठीण झाले आहे. अवैधरित्या स्टॉक करून दामदुप्पट दराने विक्री केली जात असल्याची ओरड होत आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी