शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘पुष्पा’ अन् ‘वसीम’ने संगनमत करून काढला ‘वैभव’चा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

मनसावळी येथील पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मनसावळी गाठून पुष्पाच्या घराची पाहणी केली. याच पाहणीत पुष्पाच्या घरात कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नाअंती मृतकाची ओळख पटली. 

लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : नजीकच्या मनसावळी येथील हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, दारू विक्रेत्या पुष्पा किन्नाके, रा. मनसावळी आणि वसीम कुरेशी, रा. अल्लीपूर या दोघांनी संगनमत करूनच वैभव अरुण खडसे याची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने नागपूर येथील नंदनवन परिसरातून ताब्यात घेत अटक केली.मनसावळी येथील पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मनसावळी गाठून पुष्पाच्या घराची पाहणी केली. याच पाहणीत पुष्पाच्या घरात कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नाअंती मृतकाची ओळख पटली. पुष्पाच्या घरी नेहमी येणारा वैभव खडसे, रा. यवतमाळ याचा हा मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेसह अल्लीपूर पोलिसांनी तपासाला गती देत पुष्पा किन्नाके व वसीम कुरेशी या दोघांना नागपूर शहरातील नंदनवन परिसरातून ताब्यात घेतले. प्राथमिक विचारपूसदरम्यान या दोघांनीही संगनमत करून वैभव याच्यावर तलवारीने प्रहार करून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

घटनेनंतर दोन्ही आरोपी झाले होते पसार-  संगनमत करून तलवारीने जबर प्रहार करीत वैभव खडसे याची हत्या केल्यावर मनसावळी येथील दारू विक्रेता पुष्पा किन्नाके आणि अल्लीपूर येथील वसीम कुरेशी हे दोघेही पुष्पाच्या घराला कुलूप लावून पसार झाले होते. -  पोलिसांच्या हाती आपण लागणार नाही असे काहीसे म्हणत या दोघांनीही नागपूर गाठले; पण पोलिसांनीही तपासाची चक्र फिरवीत या दोघांना हुडकून काढत अटक केली आहे. 

जिल्हा रुग्णालयात झाले शवविच्छेदन-  कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वैभवच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. डॉ. चकोर रोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैभवच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी-  या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अल्लीपूर पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर करून त्यांची २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पोलीस कोठडीदरम्यान काय नवे पुढे येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी