एकाच दिवशी १,९६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:40+5:30

कोरोना विषाणूच्या संसगार्ला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वात कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Punitive action against 1,968 persons on the same day | एकाच दिवशी १,९६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

एकाच दिवशी १,९६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

ठळक मुद्देप्रशासनाचा त्रिसूत्रीवर भर : मास्क न वापरणाऱ्यांकडून ३.९४ लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनातील चार यंत्रणांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून मास्क न वापरणाऱ्या तब्बल १ हजार ९६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३.९४ कोटींचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे मोहीम सोमवारीही राबविण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूच्या संसगार्ला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वात कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ९६८ व्यक्तींवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो. लोकांनी स्वयंप्रेरणेने या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असेही या मोहिमेद्वारे नागरिकांना समजावून सांगण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. अशावेळी लोकांनी स्वत:हून नियमांचे पालन करावे असे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रशासनाला पुन्हा दंडात्मक कारवाईची धडक मोहीम हाती घ्यावी लागली. यामध्ये एक सूत्र आणि धडक कारवाई असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेवरून मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सकाळी ६ वाजतापासून या मोहिमेला जिल्ह्यात एकावेळी सुरुवात करण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाचे ३१० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी सूचनांची प्रभावी अंमलबजावणी केली.

Web Title: Punitive action against 1,968 persons on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.