शासकीय कार्यालयात सामान्यांची हेळसांड
By Admin | Updated: June 16, 2014 23:39 IST2014-06-16T23:39:35+5:302014-06-16T23:39:35+5:30
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय यंत्रनेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांचे शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांना आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय

शासकीय कार्यालयात सामान्यांची हेळसांड
दारोडा : तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शासकीय यंत्रनेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांचे शासकीय कामकाज वेळेवर होत नाही. नागरिकांना आपले कामे करून घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामध्ये श्रम, वेळ, पैसा, खर्र्च होऊन सुद्धा सामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. हा प्रकार हिंगणघाटमधील पंचायत समितीमध्ये नियमित घडत असल्याचे नागरिक सांगत आहे.
सामान्य नागरिकांना विविध शासकीय कामकाजासाठी नेहमीच तहसील कार्यालये, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय जि.प. कृषी विभाग यासह अनेक शासकीय कार्यालयांशी संबंध येतो. शासकीय कार्यालयात असलेले अधिकारी व कर्मचारी हे जनतेचे सेवक असल्यामुळे त्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे अपेक्षित वेळेत सौजन्यपूर्वक करून देणे आवश्यक आहे. असे असतानाही नागरिकांना कामासाठी उंबरठे झिजविल्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही ठिकाणी अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयातच राहत नाही. अशा वेळेस नागरिकांना नाहक मनस्ताप वाढत जातो. जर एखाद्या वेळेस अधिकारी कर्मचारी भेटले तर काम होईलच याची शास्वती फार कमी असते.
शासनाने शेतकऱ्यांसाठी गत दोन वर्षांपूर्वी सातबारा मध्ये असलेली शेतजमीन भोगवटदार वर्ग दोन मधील असेल तर ती एक मध्ये करून घेण्याचे काम तलाठ्याकडे सोपविले. हे काम विनामूल्य करायचे होते. परंतु या कामासाठी अनेकांजवळून ३०० रुपये घेतल्याचेही शेतकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि इतरही नागरिकांची लूट सुरू आहे. नियमानुसार कुठलीही कामे वेळेत होत नसल्याचा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे तरी वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)