शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

‘थ्री फेज’ वीजपुरवठा दिवसा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी, रात्रीला वन्यप्राण्यांचीही भीती : थंडीत कसे करावे ओलित?

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रबी हंगाम सुरू झाल्यामुळे चणा, गहू तसेच खरिपातील कपाशी, तूर पिकांना ओलित सुरू झाले आहे. याकरिता वीज वितरण कंपनीने दिवसालाच कृषिपंपाकरिता वीजपुरवठा करावा , अशी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव, सोनेगाव (आ.), दहेगाव, केळापूर सह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.तीन दिवस रात्री १० वाजतानंतर वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती असते.रात्री जिवावर उदार होऊनच पिकांना ओलित करावे लागते, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. ओलिताच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने सातही दिवस दिवसाच वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रात्रीच्या वेळेला सरपटणाऱ्या तथा वन्यप्राण्यांचा शेतात मुक्त संचालन असल्यामुळे जिवाला धोका असते. अणि थंडीमुळे आजारी पडण्याची शक्यता असतो.- मनीष येणकर, शेतकरी जामणी.वीज वितरणचा दुजाभावघोराड - बागायती तालुका असलेल्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांप्रति वीज वितरण दुजाभाव करीत असून तालुक्यातील काही शेतकºयांकरिता त्रासदायक ठरत आहे. तरी वीज वितरण कंपनीने हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी होत आहे.सेलू तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना कृषिपंपाचा थ्री फेज वीज पुरवठा निरंतर २४ तास दिला जातो, तर काही शेतकºयांना सिंगल फेजचा सामना करावा लागत आहे. त्यात आठवड्यातून चार दिवस रात्री-अपरात्री कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकºयांना ओलितासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हा दुजाभाव का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.सेलू तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सेलू येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी पुढाकार घेऊन करीत असलेले कार्य पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा २४ तास किंवा दिवसा निरंतर वीज पुरवठा देऊन शेतकऱ्यांप्रति असलेला वीज वितरणचा दुजाभाव दूर करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज