शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

‘थ्री फेज’ वीजपुरवठा दिवसा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी, रात्रीला वन्यप्राण्यांचीही भीती : थंडीत कसे करावे ओलित?

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रबी हंगाम सुरू झाल्यामुळे चणा, गहू तसेच खरिपातील कपाशी, तूर पिकांना ओलित सुरू झाले आहे. याकरिता वीज वितरण कंपनीने दिवसालाच कृषिपंपाकरिता वीजपुरवठा करावा , अशी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव, सोनेगाव (आ.), दहेगाव, केळापूर सह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.तीन दिवस रात्री १० वाजतानंतर वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती असते.रात्री जिवावर उदार होऊनच पिकांना ओलित करावे लागते, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. ओलिताच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने सातही दिवस दिवसाच वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रात्रीच्या वेळेला सरपटणाऱ्या तथा वन्यप्राण्यांचा शेतात मुक्त संचालन असल्यामुळे जिवाला धोका असते. अणि थंडीमुळे आजारी पडण्याची शक्यता असतो.- मनीष येणकर, शेतकरी जामणी.वीज वितरणचा दुजाभावघोराड - बागायती तालुका असलेल्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांप्रति वीज वितरण दुजाभाव करीत असून तालुक्यातील काही शेतकºयांकरिता त्रासदायक ठरत आहे. तरी वीज वितरण कंपनीने हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी होत आहे.सेलू तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना कृषिपंपाचा थ्री फेज वीज पुरवठा निरंतर २४ तास दिला जातो, तर काही शेतकºयांना सिंगल फेजचा सामना करावा लागत आहे. त्यात आठवड्यातून चार दिवस रात्री-अपरात्री कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकºयांना ओलितासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हा दुजाभाव का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.सेलू तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सेलू येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी पुढाकार घेऊन करीत असलेले कार्य पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा २४ तास किंवा दिवसा निरंतर वीज पुरवठा देऊन शेतकऱ्यांप्रति असलेला वीज वितरणचा दुजाभाव दूर करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज