शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गीतेतील तत्त्व जीवनाला मार्गदर्शन करणारे

By admin | Updated: December 7, 2015 06:04 IST

भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण

उषादीदी : जीवन परिवर्तनात भगवद् गीता योगदानावर प्रवचनवर्धा : भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण वचनातील तत्वात मानवी जीवनात अमरत्त्व प्रदान करण्याची क्षमता आहे. जगण्याच्या या संघर्षात जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन गीतेतून मिळते, असे विचार राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषादीदी यांनी व्यक्त केले. जीवन परिवर्तनात भगवद्गीतेचे योगदान या विषयावर प्रवचन देताना त्या बोलत होत्या.येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्यावतीने आयोजित प्रवचनाचे रविवारी सायंकाळी खा. रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर नागपूर क्षेत्राच्या संचालिका रजनीदीदी, वर्धा केंद्राच्या संचालिका माधुरीदीदी, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जि.प. सदस्य विरेंद्र रणनवरे, पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, मनीषादीदी, मंगलादीदी, लालवाणी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रार्थना गीत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच अनुजा हिने स्वागत नृत्य सादर केले. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यावर उषादीदी यांच्या प्रवचनाला प्रारंभ झाला.पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गीता हा ग्रंथ भगवान उवाच् आहे. त्यामुळे या ग्रंथाला विशेष महत्त्व ताहे. गीतेत चारही वेदांचा सार आहे. गीता ग्रंथाला मायेची उपमा दिली जाते. या जगातील उर्वरीत ग्रंथ ही गीतेची लेकरं आहे. जगभरातील धर्मग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाचे गीतेतील तत्वज्ञानाशी साधर्म्य आहे. भगवद गीतेत हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. हा ग्रंथ मानव कल्याण्यासाठी आहे. यात विशुद्ध आध्यात्मिक ज्ञानाच अंतर्भाव आहे. या ग्रंथाचा कोणताही धर्म अथवा संप्रदायासोबत सबंध नसून केवळ मानव कल्याण्याचा सार आहे. महर्षी वेदव्यास यांना समधी अवस्थेत गीता ग्रंथाची ज्ञानप्राप्ती झाली होती. नास्ट्रोडॅमस नामक भविषवेत्त्याने एका गोलात संपूर्ण जगाचे भविष्य पाहिले असे म्हणतात. ते त्याने काव्यरूपात मांडले. मात्र भारतीतील तत्कालीन ऋषी, मुनी यांनी वर्तमान आणि भविष्यातील समाज व्यवस्थेवर भाष्य केले होते. केवळ भाष्यच न करता समाजाला उदभवणाऱ्या समस्या आणि उपाययोजना त्यात सांगितल्या आहे, असे त्यांनी प्रवचनात सांगितले. यावेळी शेकडो श्रोतावर्ग उपस्थित होता.(स्थानिक प्रतिनिधी)