शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

गीतेतील तत्त्व जीवनाला मार्गदर्शन करणारे

By admin | Updated: December 7, 2015 06:04 IST

भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण

उषादीदी : जीवन परिवर्तनात भगवद् गीता योगदानावर प्रवचनवर्धा : भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण वचनातील तत्वात मानवी जीवनात अमरत्त्व प्रदान करण्याची क्षमता आहे. जगण्याच्या या संघर्षात जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन गीतेतून मिळते, असे विचार राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषादीदी यांनी व्यक्त केले. जीवन परिवर्तनात भगवद्गीतेचे योगदान या विषयावर प्रवचन देताना त्या बोलत होत्या.येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्यावतीने आयोजित प्रवचनाचे रविवारी सायंकाळी खा. रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर नागपूर क्षेत्राच्या संचालिका रजनीदीदी, वर्धा केंद्राच्या संचालिका माधुरीदीदी, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जि.प. सदस्य विरेंद्र रणनवरे, पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, मनीषादीदी, मंगलादीदी, लालवाणी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रार्थना गीत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच अनुजा हिने स्वागत नृत्य सादर केले. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यावर उषादीदी यांच्या प्रवचनाला प्रारंभ झाला.पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गीता हा ग्रंथ भगवान उवाच् आहे. त्यामुळे या ग्रंथाला विशेष महत्त्व ताहे. गीतेत चारही वेदांचा सार आहे. गीता ग्रंथाला मायेची उपमा दिली जाते. या जगातील उर्वरीत ग्रंथ ही गीतेची लेकरं आहे. जगभरातील धर्मग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाचे गीतेतील तत्वज्ञानाशी साधर्म्य आहे. भगवद गीतेत हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. हा ग्रंथ मानव कल्याण्यासाठी आहे. यात विशुद्ध आध्यात्मिक ज्ञानाच अंतर्भाव आहे. या ग्रंथाचा कोणताही धर्म अथवा संप्रदायासोबत सबंध नसून केवळ मानव कल्याण्याचा सार आहे. महर्षी वेदव्यास यांना समधी अवस्थेत गीता ग्रंथाची ज्ञानप्राप्ती झाली होती. नास्ट्रोडॅमस नामक भविषवेत्त्याने एका गोलात संपूर्ण जगाचे भविष्य पाहिले असे म्हणतात. ते त्याने काव्यरूपात मांडले. मात्र भारतीतील तत्कालीन ऋषी, मुनी यांनी वर्तमान आणि भविष्यातील समाज व्यवस्थेवर भाष्य केले होते. केवळ भाष्यच न करता समाजाला उदभवणाऱ्या समस्या आणि उपाययोजना त्यात सांगितल्या आहे, असे त्यांनी प्रवचनात सांगितले. यावेळी शेकडो श्रोतावर्ग उपस्थित होता.(स्थानिक प्रतिनिधी)