शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तुरीचे भाव घसरले; बाजारात आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:07 IST

विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातही घट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. तुरीचे भाव घसरल्याने सेलू, हिंगणघाट, वर्धा आदी बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे. सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीला ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रूपये भाव देण्यात आला. बाजार समितीत एकदम आवक वाढल्याने भाव मंदावले आहे. अशी स्थितीतही शेतकरी आपला शेतमाल विकण्यावर भर देत आहे. हिंगणघाटही कापूस व तुरीची मोठी बाजारपेठ असून हिंगणघाटच्या बाजारपेठेत बुधवारी तुरीला ५ हजार २०१ रूपये भाव देण्यात आला.वर्धा जिल्ह्यात काही भागात शेतकरी तुरीची सलग लागवड करतात. त्यामुळे त्यांना उत्पन्नाची आशा होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने अनेकांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. राज्यसरकारने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यासाठी फार व्यवस्था केलेली नाही. याच्या नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी अनेक शेतकरी थेट बाजारपेठेतच तूर विक्रीसाठी आणून व्यापाऱ्यांना ती देत आहेत. काही शेतकºयांना नगदी चुकारे मिळाले असून काही शेतकºयांनी तूर बाजार समितीच्या तारण योजनेत ठेवलेली आहे. शेतमाल साठवणूकीसाठी सर्व शेतकºयांकडे व्यवस्था नसल्याने कापूस, तूर, सोयाबीन या शेतमालाची तात्काळ विक्री करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे व्यापारी देईल तो भाव अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे. बाजारात आवक वाढल्याने भाव पडले आहेत. कापसाची ही अशीच अवस्था झाली आहे.