नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्या
By Admin | Updated: May 3, 2016 02:39 IST2016-05-03T02:39:53+5:302016-05-03T02:39:53+5:30
जिल्हा लोकशाही दिनात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची

नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्या
वर्धा : जिल्हा लोकशाही दिनात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीची माहिती तात्काळ उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.
जिल्हा लोकशाही दिनात सोमवारी जिल्ह्यातून आलेल्या आठ नवीन तक्रारी व दहा जुन्या अशा एकूण १८ तक्रारींची दखल घेण्यात आली. यावेळी प्रत्येक तक्रारदारांनी त्यांचे गाऱ्हाणे मांडले. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी प्रत्येक तक्रारी संदर्भात माहिती घेऊन संबंधित विभागांना जनतेच्या तक्रारीवर प्राधान्याने निर्णय घेण्याच्या सूचना केल्यात.
बोरगाव पुनर्वसन येथील विनोद महादेव कदम यांनी खासगी सावकाराकडून ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची माफी योजनेंतर्गत मिळावी यासाठी अर्ज केला. तालुकास्तरीय समितीने यावर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात.
ग्रामीण भागातील शेतीची मोजणी न झाल्यामुळे बांदबंदीस्तीची कामे खोळंबली. इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळावा तसेच वैयक्तिक अडचणी तक्रारदारांनी आपल्या तक्रारी आज दाखल केल्यात. यामध्ये वर्ध्याच्या रामनगर येथील वामन उर्फ बाबा नाईक, भारत गोपाळ अलोनी (वरूड), वामन गोमासे, आंजी (मो.), जमनाबाई नाईक (रोहणा), मोनीबाबा निफाटे (पिंपळखुटा), केशव नामदेव बुराडे (वाघोली), कवडेश्वर बोबडे (हिंगणघाट), वसंत ढोबे (वर्धा) अशा आठ नवीनसह जुन्या १० तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, उपवनसंरक्षक पगार, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता देशपांडे, महसूल उपविभागीय अधिकारी, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड तसेच विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)