शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पॉझिटिव्हीटी रेट ‘हाय’; जिल्ह्याची पहिल्या पाचमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 5:00 AM

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध सेवा संचारबंदीच्या काळात सकाळी ६ ते सकाळी १० वाजता या कालावधीत सुरु राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, एसटी बसेस यासह खासगी वाहतूक (जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता) पूर्णत: बंद राहतील.

ठळक मुद्देपुन्हा ३६ तासांची बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांकडून कोरोना उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याने जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ही रेट चांगलाच वाढला आहे. पहिल्या लाटीमध्ये सर्वात शेवटी असलेला जिल्हा आता या दुसऱ्या लाटीत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून पुन्हा ३६ तासांची संचारबंदी लागू केली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध सेवा संचारबंदीच्या काळात सकाळी ६ ते सकाळी १० वाजता या कालावधीत सुरु राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, एसटी बसेस यासह खासगी वाहतूक (जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता) पूर्णत: बंद राहतील. तर दूध डेअरी व विक्रीसेवा सकाळी ६ ते सकाळी १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत सुरु राहतील. औषधी दुकाने, रुग्णालये, वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, एमआयडीअंतर्गत येणाºया सर्व आस्थापना मजुरांसह सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेंतर्गत महावितरणची वीज सेवा, जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा सेवा, गॅस सेवा, रोड दुरुस्ती व नाले सफाईही सुरु राहणार आहे. विनाकारण चारचाकी व दुचाकीने वाहतूक करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे. 

घाबरु नका, प्रशासनाला सहकार्य कराजिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. चाचणीची संख्या दुप्पट करण्यात आली असून फिरते निगराणी पथक कार्यरत आहे. लोकप्रतिनिधींकरिताही ग्रामीण आणि शहरी भागात सोमवार, मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी रुग्ण वाढत असल्यास आणखी निर्बंध घातले जाईल. सर्वांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी यामध्ये सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी. 

निगराणी पथक अ‍ॅक्टिव्ह करावेसेवाग्राम आणि सावंगी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर रुग्ण आठ ते दहा दिवस आजार अंगावर काढतात. त्यानंतर शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल होतात, असे लक्षात आले. त्यामुळे कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. म्हणून लक्षणे दिसताच तात्काळ चाचणी करुन घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरुवातीप्रमाणेच गावात ग्राम निगराणी पथक करावे. ग्रामीण भागातील सरपंच, सदस्य आणि शहरीभागातील नगरसेवक यांनी याकरिता पुढाकार घ्यावा.- डॉ.सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी. 

पॉझिटिव्ह रुग्णांनी योग्य माहिती द्यावीकोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांनी संपर्कात आलेल्या प्रत्येकाची योग्य माहिती द्यावी. जेणे करुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन त्यांची तपासणी करता येईल. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तसेच प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcollectorजिल्हाधिकारी