शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:33 IST

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.

ठळक मुद्देध्येयवेड्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग : नांदी फाऊंडेशनचे लाभले सहकार्य

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.केळापुर येथील शेतकरी वंदन नारायण जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळिंबाची बाग फुलविली आहे. शिवाय सध्या भरघोस फळानी ही बाग बहरली आहे. शेतकरी वंदन जाधव यांच्याकडे ५ एकर ओलिताची शेती आहे. त्यांनी दोन एकर शेतात नांदी फाऊंडेशनच्यावतीने २०१५-१६ साली डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. तसेच दोन एकर शेतातील डाळींब झाडांची दोन विभागामध्ये विभागणी केली. एक एकर शेतातील झाडे अंबीया बहरा करीता तर एक एकर शेतातील झाडे मृग बहराकरिता तयार करण्यात आले. अंबीया बहराचे डाळींब फळ तोडण्या योग्य झाले आहेत. तर मृग बहराच्या झाडांची पाहणी केल्यावर फळ कळी धरण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसते. फळाच्या वजनाने काही झाडे वाकली आहेत. एका झाडाला किमान ३०-४० फळ आहेत. तर एका फळाचे वजन २०० ते ४०० ग्रॅम पर्यंत आहेत. सेंद्रिय डाळींबाना बाजार पेठेत अधिक प्रमाणात मागणी आहे. उत्पन्न घेण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे नक्की उत्पन्न किती होईल, हे सांगणे कठीण असल्याचे शेतकरी सांगतो.सरासरी १०० रुपये भाव मिळण्याची अपेक्षाबाजार भावा नुसार १५० ग्रॅम वजनाचे डाळींब प्रतिकिलो ६० रूपये प्रमाणे आहेत. तर २०० ग्रॅमचेवर ८० रूपये, आणि ३०० ग्रॅम वजनच्या वर प्रतिकिलो १२० रूपयेप्रमाणे आहेत. इतकेच नव्हे, तर सरासरी १०० रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकºयाला आहे.रासायनिक खतांचा वापर नाहीचया डाळीबांच्या बागेमध्ये सुरूवातीपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधी वापरण्यात आली नाही. गरज भासल्यावर सेंद्रिय खत देत औषधांची फवारणी करण्यात आली.धुऱ्यावर शेवग्याची झाडेरासायनिक शेतीचा प्रार्दुभाव डाळिंबाच्या झाडांवर होऊ नये याकरिता धुºयावर शेवगाची झाडे लावण्यता आली. यामुळे डाळिंबाच्या झाडांना वादळाचा पाहिजे तसा फटका सहन करावा लागत नाही. शिवाय काही प्रमाणात उष्ण तापमानाचा प्रभाव कमी करता येत असल्याचे शेतकरी सांगतो. या शेतकºयाचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, शैलेंद्र डेचेलवार, प्रकाश चावळे, पुरूषोत्तम मुंजेवार, संदीप चावक, दत्ता महाजन, कुलदीप बैस, सूर्यकांत बोरकर यांनीही सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग तयार केल्याचे सांगण्यात येते.