तालुक्यातील पोलीस पाटील मुख्यालयी गैरहजर
By Admin | Updated: February 15, 2016 02:19 IST2016-02-15T02:19:54+5:302016-02-15T02:19:54+5:30
गावातील वाद गावातच निकाली काढण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते; पण आष्टी तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील मुख्यालयी राहत नसल्याची ओरड...

तालुक्यातील पोलीस पाटील मुख्यालयी गैरहजर
तळेगाव (श्या.पं.) : गावातील वाद गावातच निकाली काढण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते; पण आष्टी तालुक्यातील बहुतांश पोलीस पाटील मुख्यालयी राहत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मुख्यालयी राहण्याचे आदेश देणे गरजेचे झाले आहे.
वादविवाद, भांडण, तंटे सामोपचाराने मिटविणे वा पोलीस ठाण्याला कळविणे ही जबाबदारी पोलीस पाटलांची असल्याचे सांगण्यात येते; पण त्यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे गरजेचे असते. आष्टी तालुक्यातील पोलीस पाटील ही जबाबदारी पार पाडत नसल्याची ओरड होत आहे. अनेक पोलीस पाटलांनी नियम धाब्यावर बसवून तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्य केल्याचे दिसून येत आहे. यामुळे गावांतील कलह वाढतीवर असल्याचे दिसते.
प्रशासनाने ज्या उद्देशाने पोलीस पाटलांची नियुक्ती केली, त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक गावात पोलीस पाटील भांडण, तंटे मिटविण्यासाठी तर सोडा; दाखल्यावर सहीसाठीही मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचीही गोची होत आहे.(वार्ताहर)