शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

पोलीस लाईफ... ऑन ड्युटी २४ तास, ना कुटुंबाकडे लक्ष, ना प्रकृतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:14 IST

Wardha News पोलीस लाईफ पाहिले तर तेवढे सोपे नाही. पोलिसांचे ना कुटुंबाकडे लक्ष असते, ना त्यांना ड्युटीची वेळ असते. ना त्यांच्या आरामाची वेळ असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

ठळक मुद्देमुला-बाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष दिलेला जेवणाचा डब्बा रात्री तसाच येतो परत

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ‘सद् रक्षणाय... खलनिग्रहणाय’ पोलिसांच्या या ब्रीद वाक्याप्रमाणेच पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी आहे. ऑनड्युटी २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. पोलीस लाईफ पाहिले तर तेवढे सोपे नाही. पोलिसांना विविध समस्यांतून, संकटांतून सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांचे ना कुटुंबाकडे लक्ष असते, ना त्यांना ड्युटीची वेळ असते. ना त्यांच्या आरामाची वेळ असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

पाेलिसांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बंदोबस्तासाठी रस्त्यावर यावे लागते. सकाळी कर्तव्यावर निघालेला पोलीस रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतो. कधी दोन शिफ्टमध्ये कामही करावे लागते. यामुळे पोलिसांच्या प्रकृतीसह त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासही त्यांना वेळ मिळत नाही. मोर्चे, आंदोलने, राजकीय पक्षांच्या सभा, मंत्र्यांचे दौरे या सर्व गोष्टींसाठी त्यांना २४ तास सतर्क राहावे लागते. त्यामुळे पोलिसांना किमान पाच मिनिटे आराम करायला वेळ मिळत नाही. अशातच मुले केव्हा मोठी झाली हे त्यांना कळतच नाही. सकाळी निघालेला पोलीस कर्मचारी एकदम मध्यरात्रीच येत असल्याने मुलांशीही भेटीगाठी होत नाहीत. त्यामुळे कुटुंबाकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. मात्र, अशातही पोलीस कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत.

याव्यतिरिक्त दररोज शहरात व जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारी घेणे, आरोपीला पकडणे, त्याला न्यायालयात हजर करणे, आदी कामे पोलिसांना नित्यनियमाने करावी लागतात. पोलिसांना त्यांच्या जीवनात कमी आणि पहिले प्राधान्य नोकरीला द्यावे लागते. त्यांच्या वैयक्तिक जीवनात लक्ष देणे पोलिसांना म्हणावे तेवढे सोपे नाही. केव्हा वरिष्ठांचा फोन येईल आणि कधी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल, याचा नेम नसतो.

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या प्रकृतीकडेही लक्ष देण्यास वेळ नसतो. सकाळी बायकोने भरून दिलेला जेवणाचा डब्बा बंदोबस्तामुळे खाता येत नसल्याने अनेकदा रात्री तसाच परत आणला जातो. मी इतक्या वाजता येईन... आपण बाहेर फिरायला जाऊ... मुलांना घेऊन हॉटेलला जाऊ, असे पोलीस छातीठोकपणे सांगू शकत नाही. सांगितले असेल तर त्या वेळेवर ते पोहोचू शकत नाहीत. अशी जीवनशैली पोलिसांची असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र, कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. नोकरीसाठी पोलीस तेदेखील सहन करून घेतात.

पोलीस ड्युटी १२ तासांची...

वास्तविक पाहता पोलिसांना १२ तासांची ड्युटी असते. मात्र, पोलीस स्टेशनमधील आणि टेबलवर काम करणारे कर्मचारीवगळता पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखेतील कर्मचारी यांना २४ तास आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे लागत असून, त्यांच्या ड्युटीची वेळ निश्चित नसते.

कुटुंबाला देता येत नाही वेळ

सकाळी मुले झोपेतून उठण्यापूर्वीच पोलीस कर्मचारी कर्तव्यावर निघून जातात. कधी वेळ मिळाला तर मुलांना भेटता येते. मात्र, सकाळी घरून निघालेला पोलीस कर्मचारी मध्यरात्रीच घरी परत येत असल्याने तेव्हाही मुले झोपलेली असतात. यामुळे कुटुंबाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही.

शाळेत पालकसभेलाही जाता येत नाही

मुलांचे शिक्षण कसे सुरू आहे, हे पोलिसांना कळत नाही. शाळेत होणाऱ्या पालक सभेलाही उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होते. असे असतानाही अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षित आहेत.

अनेकांकडे स्वत:चे घर नाही

पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते. मात्र, अनेक पोलिसांनी आपले स्वत::चे घर बांधले असून, अनेकांडे अजूनही हक्काचे घर नाही. बहुतांश पोलीस कर्मचारी आजही शासकीय निवासस्थानातच राहात असल्याचे चित्र आहे.

माझे पती मुख्यालयात कर्तव्यावर आहेत. कुटुंबासाठी त्यांना वेळ नसतो. पाहता पाहता मुलीही मोठ्या झाल्यात. एका मुलीने पदवी पूर्ण केली असून, दुसरी मुलगी बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. कोरोना काळात सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मुलांना वेळ देता येत नाही. स्वत:च्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष होते. सकाळी नेलेला जेवणाचा डब्बा खाण्यासही त्यांना वेळ नसतो. रात्री दिलेला डब्बा तसाच परत येतो. पगारही कधी उशिराने होत असल्याने संसार कसा चालवावा, असा प्रश्न पडतो.

वर्षा श्रीरंग मारबते, पोलीस पत्नी

..........................

टॅग्स :Policeपोलिस