शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

वाळूमाफियांवर कारवाईसाठी बंदूकधारी पोलीस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो. शिवाय अवैध उत्खनन माफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपण्यात आली आहे. सध्या स्थितीत उत्खनन माफियांकडून विनापरवाना बंदूक बाळगली जात आहे. इतक्यावर ते थांबत नसून कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करीत आहेत.

ठळक मुद्देराजपत्रित अधिकाऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळूमाफियांकडून उस्मानाबाद जिल्ह्यात तहसीलदारांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध करीत वाळूमाफियांवर कारवाई करताना बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो. शिवाय अवैध उत्खनन माफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपण्यात आली आहे. सध्या स्थितीत उत्खनन माफियांकडून विनापरवाना बंदूक बाळगली जात आहे. इतक्यावर ते थांबत नसून कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अवैध उत्पनन करणाऱ्यांर कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या चमूला बंदूकधारी पोलीस अधिकारी व काही पोलीस कर्मचारी तातडीने देण्यात यावे. जोपर्यंत सदर मागणी पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहन प्रतिबंधात्मक कारवाईत महसूल विभागाचा कोणताही अधिकारी सहभागी होणार नाही, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी स्विकारले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा वर्धेचे उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, स्वप्नील दिगलवार, वनकर आदींची उपस्थिती होती.रात्रीलाही करावी लागते कारवाईवाळूसह उत्खनन माफियांकडून काळोखाचा फायदा घेत अवैध उत्खनन केले जाते. शिवाय, उत्खनन केलेल्या गौणखनिजाची काळोखातच विल्हेवाट लावली जाते. अशावेळी जीव मुठीत घेऊनच अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाई करावी लागते.

टॅग्स :sandवाळू