शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

पोलीस कोमात अन् चोरटे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

ठळक मुद्देआंजी (मोठी), वायगाव (निपानी.), तळेगाव (श्या.पं.) मध्ये धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या वायगाव (नि.) येथील पाच दुकानांचे कुलूप तोडून तर आंजी (मोठी) येथे एका कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. इतकेच नव्हे तर चोरट्यांनी तळेगाव (श्या.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारातून कापूस चोरून नेला. या तिन्ही घटना मागील २४ तासांत घडल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय परिसरात चोरट्यांबाबतची दहशत निर्माण झाली आहे.आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.शेतातून परतल्यावर घराचे कुलूप उघडे दिसल्याने खेडकर यांनी घरात प्रवेश करून बारकाईने पाहणी केली असता चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच आंजी (मोठी) पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. तर दुसरी घटना तळेगांव (शा.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारात घडली. अज्ञात चोरट्यांनी रविंद्र रमेश टर्के यांच्या शेतात प्रवेश करून शेतातील वेचणी करुन ठेवलेला सुमारे ८० किलो कापूस चोरून नेला. यामुळे शेतकरी टर्के यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रविंद्र टर्के यांच्या तक्रारीवरून तळेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.पाच दुकाने फोडलीवायगाव (नि.) : येथील पाच दुकानाचे कुलूप रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रफुल झोटिंग, श्रीकांत पाल, दिलीप वांदाड यांच्या दुकानातून चोरट्यांनी मुद्देमाल पळविला. तर मेहबूब पान सेंटर आणि बछु भाई हॉटेल या दुकानातून खाद्य पदार्थांसह रोख रक्कम चोरून नेली. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने गावात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चोरीची माहिती मिळताच वायगाव पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Thiefचोर