शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्जबाजारी दाम्पत्याने घेतले विष; उपचारादरम्यान पतीचा मृत्यू, पत्नी वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 15:34 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा उपचारादरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला तर पत्नीला उपचाराअंती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

वर्धा : डोक्यावर कर्जाचं डोंगर व परिस्थितीला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा  उपचारादरम्यान एक महिन्याने मृत्यू झाला तर पत्नीला उपचाराअंती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथे ही घटना उघडकीस आली. राजेंद्र चरडे व पत्नी अर्चना चरडे अशी या दोघांची नावं असून त्यांनी ९ जानेवारीला विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष घेतल्याची माहिती मिळताच दोघांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात काही दिवसात पत्नी अर्चनाला सुट्टी देण्यात आली. मात्र, मात्र घटनेच्या एक महिन्यानंतर राजेंद्र यांचा मृत्यू झाला. 

राजेंद्रकडे दोन एकर शेती असून त्यांना दोन लहान मुली आहेत. त्यांच्या अंगावर बँकेचे ७० हजाराचे कर्ज होते. त्यासोबतच त्यांनी इतरांकडूनही कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यांनी पत्नीच्या नावावरही उमेदच्या गटातून कर्ज काढले आहे. 

कर्जाचा वाढता डोंगर व शेतीत होणारे नुकसान आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदारFarmerशेतकरीagricultureशेती