शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:29 IST

बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा वैताग : फवारणीनंतरही प्रत्येक बोंडात अळी

संजय बिन्नोड।लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकरी विजय पेटकर, दिलीप श्रीराव, श्रीकांत शिरे या शेतकºयांनी बी.टी. कपाशीची लागवड केली. पिकही वाढले, पात्या, फुले व्यवस्थीत आली. एका एका झाडाला ८० ते १०० बोंडे आहे; पण ही बोंडे गुलाबी अळीने पोखरलेली दिसली. त्यामुळे एकाही बोंडात कापूस नाही, केवळ गुलाबी अळीच आहे. कोणत्याही फवारणीला ही अळी जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषध विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळांचा प्रादुर्भाव झाला आहे. वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून बघताच त्यात गुलाबी अळी दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नावर होण्याचा शक्यता वर्तविली जात आहे.शुद्ध बोंड दाखवा हजार रुपये मिळवायेथील शेतकरी दिलीप श्रीराम यांनी तर बी.टी. कंपणीला व कृषी अधिकाºयांना एका कपाशीच्या झाडाला असलेल्या बोंडापैकी एक निरोगी बोंड दाखवा आणि माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस घ्या असेच आवाहन मी केले आहे.गुन्हा कधी दाखल होणारयेथील शेतकºयांनी बी.टी. कंपनीची या बियाण्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी अधिकाºयांनी शेतात जाऊन चौकशी केली. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाºयाकडे पाठविला. वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेत कंपनी विरोधात व ज्या कृषी केंद्रातून बियाणे घेतले त्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तशी तक्रार व चौकशी अहवाल देवळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे कळले. पण कुठलीही कार्यवाही नाही. या दोघांवरती गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकºयांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. यामुळे सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.यवतमाळात मदतीची कार्यवाही, वर्धेत मात्र केवळ चर्चाचमहसुल राज्यमंत्री तथा यवतमाळचे आ. संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कापसाचे किडलेले चुंगडीभर बोंड मंत्रालयात नेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी सचिव विजयकुमार सिंग यांच्यापुढे ठेवले. मंत्रालयात नाना राठोड यांनी बोंडअळीचे दाहक वास्तव मंत्र्यापुढे मांडले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यवतमाळसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मागितले. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारातून येथील शेतकºयांना मदत मिळविण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच असल्याचे दिसते. केवळ विकास कामांच्या नावावर टक्केवारीच्या गणितातच हे खूश असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकºयांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे.