शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:29 IST

बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा वैताग : फवारणीनंतरही प्रत्येक बोंडात अळी

संजय बिन्नोड।लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकरी विजय पेटकर, दिलीप श्रीराव, श्रीकांत शिरे या शेतकºयांनी बी.टी. कपाशीची लागवड केली. पिकही वाढले, पात्या, फुले व्यवस्थीत आली. एका एका झाडाला ८० ते १०० बोंडे आहे; पण ही बोंडे गुलाबी अळीने पोखरलेली दिसली. त्यामुळे एकाही बोंडात कापूस नाही, केवळ गुलाबी अळीच आहे. कोणत्याही फवारणीला ही अळी जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषध विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळांचा प्रादुर्भाव झाला आहे. वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून बघताच त्यात गुलाबी अळी दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नावर होण्याचा शक्यता वर्तविली जात आहे.शुद्ध बोंड दाखवा हजार रुपये मिळवायेथील शेतकरी दिलीप श्रीराम यांनी तर बी.टी. कंपणीला व कृषी अधिकाºयांना एका कपाशीच्या झाडाला असलेल्या बोंडापैकी एक निरोगी बोंड दाखवा आणि माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस घ्या असेच आवाहन मी केले आहे.गुन्हा कधी दाखल होणारयेथील शेतकºयांनी बी.टी. कंपनीची या बियाण्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी अधिकाºयांनी शेतात जाऊन चौकशी केली. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाºयाकडे पाठविला. वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेत कंपनी विरोधात व ज्या कृषी केंद्रातून बियाणे घेतले त्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तशी तक्रार व चौकशी अहवाल देवळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे कळले. पण कुठलीही कार्यवाही नाही. या दोघांवरती गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकºयांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. यामुळे सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.यवतमाळात मदतीची कार्यवाही, वर्धेत मात्र केवळ चर्चाचमहसुल राज्यमंत्री तथा यवतमाळचे आ. संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कापसाचे किडलेले चुंगडीभर बोंड मंत्रालयात नेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी सचिव विजयकुमार सिंग यांच्यापुढे ठेवले. मंत्रालयात नाना राठोड यांनी बोंडअळीचे दाहक वास्तव मंत्र्यापुढे मांडले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यवतमाळसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मागितले. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारातून येथील शेतकºयांना मदत मिळविण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच असल्याचे दिसते. केवळ विकास कामांच्या नावावर टक्केवारीच्या गणितातच हे खूश असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकºयांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे.