शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कपाशीवर गुलाबी बोंडअळ्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:29 IST

बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा वैताग : फवारणीनंतरही प्रत्येक बोंडात अळी

संजय बिन्नोड।लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : बी.टी. कापसावर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपण्याकडून केला जात होता. तरी विजयगोपाल परिसरातील कपाशी पिकावर गुलाबी अळ्यांनी हल्ला चढविला आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकरी विजय पेटकर, दिलीप श्रीराव, श्रीकांत शिरे या शेतकºयांनी बी.टी. कपाशीची लागवड केली. पिकही वाढले, पात्या, फुले व्यवस्थीत आली. एका एका झाडाला ८० ते १०० बोंडे आहे; पण ही बोंडे गुलाबी अळीने पोखरलेली दिसली. त्यामुळे एकाही बोंडात कापूस नाही, केवळ गुलाबी अळीच आहे. कोणत्याही फवारणीला ही अळी जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषध विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद झाले आहे. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळांचा प्रादुर्भाव झाला आहे. वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून बघताच त्यात गुलाबी अळी दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नावर होण्याचा शक्यता वर्तविली जात आहे.शुद्ध बोंड दाखवा हजार रुपये मिळवायेथील शेतकरी दिलीप श्रीराम यांनी तर बी.टी. कंपणीला व कृषी अधिकाºयांना एका कपाशीच्या झाडाला असलेल्या बोंडापैकी एक निरोगी बोंड दाखवा आणि माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस घ्या असेच आवाहन मी केले आहे.गुन्हा कधी दाखल होणारयेथील शेतकºयांनी बी.टी. कंपनीची या बियाण्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केली असता कृषी अधिकाºयांनी शेतात जाऊन चौकशी केली. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाºयाकडे पाठविला. वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेत कंपनी विरोधात व ज्या कृषी केंद्रातून बियाणे घेतले त्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तशी तक्रार व चौकशी अहवाल देवळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे कळले. पण कुठलीही कार्यवाही नाही. या दोघांवरती गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकºयांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. यामुळे सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.यवतमाळात मदतीची कार्यवाही, वर्धेत मात्र केवळ चर्चाचमहसुल राज्यमंत्री तथा यवतमाळचे आ. संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कापसाचे किडलेले चुंगडीभर बोंड मंत्रालयात नेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषी सचिव विजयकुमार सिंग यांच्यापुढे ठेवले. मंत्रालयात नाना राठोड यांनी बोंडअळीचे दाहक वास्तव मंत्र्यापुढे मांडले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यवतमाळसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव मागितले. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यात घडत आहे. या प्रकारातून येथील शेतकºयांना मदत मिळविण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच असल्याचे दिसते. केवळ विकास कामांच्या नावावर टक्केवारीच्या गणितातच हे खूश असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेतकºयांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे.