श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: June 15, 2014 23:44 IST2014-06-15T23:44:47+5:302014-06-15T23:44:47+5:30
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही

श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित
कारंजा (घा.) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आली नसून याचा फटका मात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
जानेवारी २०१४ मध्ये संजय गांधी निराधार समितीची सभा झाली. त्यात फक्त संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे निकालात निघून त्यांचे मानधन सुरू झाले. श्रावणबाळ योजनेयील प्रकरणे प्रलंबित राहिली. त्याची नोंद आवक रजिस्टरवर आहे. त्यानंतर ग्रा.पं.व लोकसभा, विधान परिषदेची आचारसंहिता लागली. सभेची तारीख निश्चित करून सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर ३० जूनच्या आत समितीची त्रैमासिक सभा अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रलंबित व नव्याने सादर झालेली प्रकरणे निकालात काढणे गरजेचे आहे. बीपीएलमधील श्रावणबाळ लाभार्थी वगळता संजय गांधी निराधार व नॉन बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी यावेळी अनुदान जमा करण्यास विलंब केल्याचे कळते. मे २०१४ चे अनुदान काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून दिली जाते. बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीला तांत्रिकरित्या मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित असल्याचे समजते. २०१३ मध्ये तत्कालीन महिला तहसीलदाराच्या काळातील बरीचशी प्रकरणे प्रलंबित आहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर या अधिकाऱ्यांकडे ही प्रकरणे हाताळली असताना त्यातील बरीच कागदपत्रे गहाळ झाल्याचे बोलले जाते. या संदर्भात समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच ही प्रकरणे नव्याने तपासून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत निकालात काढावयाची होती, पण त्या संदर्भातील कार्यवाही अपूर्ण राहिली. याची चौकशी करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)