शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पाणी घ्या २०० रूपये ड्रम; वर्धा जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:08 IST

उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे तसतशी पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्देथार येथील पाणीटंचाई एकाच विहिरीवरुन गावाला होतोय पाणीपुरवठा

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे तसतशी पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. थार गावात पाणीपुरवठ्यासाठी १२ बैलबंड्या तयार करण्यात आल्या असुन २०० रुपये प्रति ड्रमने पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. पण, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.डोंगरमाथ्यावर असलेल्या थार गावाचा डार्क झोनमध्ये समावेश आहे. याठिकाणी हरियाली, एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन, जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा वार्षीक योजना, सामाजिक वाणीकरण यासारख्या विविध योजनेमधून कामे करण्यात आली. मात्र जमिनीची रचना कडक स्वरूपाची असल्याने खडकाळ व दगडी भागाचा पट्टा कायम आहे. पावसाळ्यात होणारे जलव्यवस्थापन येथे शंभर टक्के असफल झाले आहे. जानेवारी महिण्यापासून भूगर्भातील पाण्याचा भाग खोलवर गेला आहे. नैसर्गीक स्त्रोत संपल्यामुळे येथे कृत्रिम पाणी व्यवस्थापनावर भर दिल्या जाते. येथे शासनाच्या कुठल्याही योजनेची प्रबळ अंमलबजावनी करण्यात आली नाही. परिणामी आज पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, जनावरांचे पाणी कुठेही दिसत नाही. गावाच्या वेशीवर एकमेव सार्वजनिक विहीर आहे. यामध्ये थोडाफार साठा दिवसाला संचयित होतो. त्यामधून गावातील नागरिक आपली तहान भागवत होते. तीही विहीर कोरडी झाल्याने गावकरी दुरवरुन पाणी आणतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार ठीक आहे. असे नागरिक २०० रुपये प्रति ड्रम या दराने पाणी विकत घेऊन घरातील कामधंदा आणि तृष्णातृप्ती करुन आपली निकड भागवित आहे.गावात इतकी भीषण पाणीटंचाई असताना ग्रामपंचायतने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अद्याप प्रस्तावच पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.ग्रामपंचायतकडून टँकरबाबत काहीही पाठपुरावा केला नसल्याने गावात ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. पाण्याअभावी गावातील दोन हजारावर जनावरांनी दुसरीकडे स्थलांतर केले आहे. या परिसरात दही, ताक, तुप व दुध या स्रिग्ध पदार्थाचे भरपूर उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाल्याने जनावरांना जगविण्याची मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गोपालकांनी गाव सोडले आहे. आता नागरिकांनाही पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. सामान्य परिवार पाणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे थार या गावातील पाण्याची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ग्रामपंचायतचे विकासकामात लक्ष नाही. केवळ राजकारण करून ग्रामस्थांना वेठीस धरून सामान्य नागरिकांना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर खस्ता खाव्या लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा न केल्यास गावकऱ्यांसह आंदोलन करणार.- राजकुमार निस्वादे, माजी सरपंच, थार

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई