शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडून प्रवाशांना एक रुपयात मिळते दहा लाख रुपयांचे विमा कवच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:02 IST

सुरक्षित प्रवासाला प्राधान्य : जखमींनाही मिळते मदत

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सुरक्षित प्रवासासाठी बसला प्राधान्य दिले जाते. परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर १० लाखांपर्यंत भरपाई मिळते. तर जखमींना गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी असल्यास त्याला नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाते.

राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही गेल्या सात दशकांहून अधिक वर्षांपासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. एसटीचे हे वेगळेपण जसे आहे तसेच आणखी एक वेगळेपण पण एसटीने कधीही या पेशाकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य जोपासत असताना प्रवासी हिताला, प्रवासी सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे. एसटीचे चालक-वाहक हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे एसटीला अपघात झाल्याच्या घटना फारच कमी आहेत. त्यातूनही एखादी दुर्घटना घडलीच तरी एसटीतील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या वारसांना तब्बल १० लाखांची नुकसान भरपाई दिली जाते. 

१ लाख ३५ हजारांची मदत जिल्ह्यात बसच्या अपघातात जखमी झालेल्यांना आतापर्यंत एसटी महामंडळाकडून निकषा- नुसार एक लाख ३५ हजार ८३४ रुपयांची मदत प्रवाशांना केली आहे.

जखमी प्रवाशांनाही मदतीचा हात अनेकदा एसटीच्या अपघातामुळे प्रवासी किंवा बाहेरील व्यक्ती जखमी होण्याच्या घटना घडतात. अशावेळी एसटीकडून संबंधित जखमींवर उपचार केले जातात. त्यासाठी लागणारा खर्च दिला जातो. तसेच दवाखान्यात जाण्यासाठी प्रवासात सवलतही दिली जाते.

कोणाला मिळते मदत? एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू झालेला असल्यास मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे वारसदार किंवा एसटीच्या धक्क्यामुळे रस्त्यावरील सायकलस्वार, पादचारी, बैलगाडी चालक, घोडेस्वार यांचा मृत्यू झालेला असल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसाला ही रक्कम दिली जाते.

तिकिटातल्या १ रुपयात १० लाखांचा विमा एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजनांतून सवलत दिली जाते. मग त्या महिला असो वा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी असो वा कामगार सर्वांसाठी प्रवासात सवलती दिल्या आहेत. शिवाय बसमधून प्रवास करताना काढलेल्या तिकिटात एक रुपयात १० लाख रुपयांचा विमा कवचही दिला जातो.

सुरक्षित प्रवासाची एसटीकडून हमी 

  • एसटी महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. त्याला कारणही तसेच आहे. 
  • एसटीच्या चालकांना सक्त सूचना असतात. 
  • त्यामुळे कोणत्याही पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास कधीही एसटी पाण्यात घातली जात नाही. 
  • जवळच्या बसस्थानकात नेऊन लावली जाते. 
  • एसटी चालक-वाहकांना आठ ते दहा तासांचीच ड्यूटी लावली जाते. त्यामुळे कामाचा ताण ही बाब फारशी उरत नाही.

बसचा अपघात झाल्यास याप्रमाणे मिळते मदत 

  • जखमी झाल्यास ५ लाख 
  • मृत्यू झाल्यास १० लाख 
  • अपंगत्वास १ ते २.५ लाख 

११ महिन्यांत एसटीचे ३६ अपघातजानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या अकरा महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागात एकूण ३६ अपघात झाले. यात २ जणांना मृत्यू झाला. १८ जण गंभीर जखमी, तर १६ जण किरकोळ जखमी झाले.

"एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू झाल्यास तसेच जखमी झाल्यास त्यांना अपघाती मदत केली जाते. मात्र एसटी आणि इतर वाहनात अपघात झाल्यास यात नियमानुसार मदत केली जाते. एसटी अपघात फार क्वचित होतात." - प्रताप राठोड, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धाAccidentअपघातBus Driverबसचालक