गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ...
केळीचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातून केळीचे पीक हद्दपार होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अशातच पवनार येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांने ४० हजार पील लागवडीचे नियोजन केले आहे. ...
स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. ...
स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
मूळची चेन्नई येथील रहिवासी असलेली पण सध्या गुजरात येथील सुरत येथे वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेचे जयपूर-चन्नई एक्स्प्रेसमधून अपहरण करण्यात आले. अपहरण करण्यात आलेल्या नवविवाहितेच्या भ्रमणध्वनीचे शेवटचे लोकेशन वर्धा नजीक आढळून आल्याने तेलंगण ...
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे ...
येथील आश्रमात बापूकुटीच्या फाटकाजवळ महात्मा गांधीजींनी लावलेले अजस्त्र पिंपळाचे झाड आहे. या झाडाला ८२ वर्षे लोटली आहेत. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने हे झाड धोक्यात आले होते. याला संरक्षित करून हिरवेगार ठेवण्यासाठी आश्रमची धडपड सुरू असल्याचे दिसून येत ...
महात्मा फुले आर्थिक विकास मंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्या जाते परंतु, मागील सहा महिन्यांपासून एकाही बेरोजगाराला कर्ज पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे मागासवर्गीय बेरोजगार संतप्त झाले असून भीम टायगर सेनेच्या नेतृत्त्वात ...