शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टेकडीवरील ऑक्सिजन पार्कला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:22 IST

स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.

ठळक मुद्देपाईप जळाले : सहा फूट उंचीच्या झाडांचा कोळसा, आंबटशौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.पूर्वी ओसाड असलेल्या हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. त्याच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. परिणामी, हनुमान टेकडी परिसराला ‘ऑक्सिजन  पार्क’ अशीच नवी ओळख मिळाली. याच ऑक्सिजन पार्क परिसरात अनेक जण सकाळी फिरायला येत असून रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली.ऑक्सिजन पार्क परिसरात आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.घटनास्थळी पोहोचलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होती. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.यंदाची तिसरी घटनाहनुमान टेकडी परिसरात आग लागल्याची ही यंदाच्या वर्षीची तिसरी घटना आहे.या परिसरात रात्रीच्या सुमारास गांजा, दारू शौकिनांचा डेरा असतो. परंतु, पोलीस प्रशासनातील अधिकारी या आंबट शौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.साटोडा चौक परिसरात ‘दी बर्निंग कार’रिंगरोडवरील साटोडा चौक परिसरात भरधाव असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच कारचालक वेळीच वाहनाबाहेर पडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; पण संपूर्ण कार जळून कोळसा झाली. गिरीश शर्मा असे कारचालकाचे नाव असून तो कांदिवली मुंबई येथील रहिवासी आहे. गिरीश शर्मा हे यवतमाळवरून नागपूरच्या दिशेने एम. एच. ०४ टी.एस.५०४६ क्रमांकाच्या कारने जात असताना ही घटना घडली.शास्त्री चौकातील तीन टपऱ्या जळाल्यावर्धा शहरातील शास्त्री चौक परिसरात रविवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत तीन टपऱ्या जळाल्या. आग लागल्याचे निदर्शनास येताच न.प.च्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत श्रीवास्तव यांच्या मालकीची टपरी तसेच शेजारी असलेल्या गॅस वेल्डिंगच्या व इतर दुसºया दुकानातील साहित्य जळून कोळसा झाल्याने सदर तिन्ही छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.