शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

टेकडीवरील ऑक्सिजन पार्कला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:22 IST

स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.

ठळक मुद्देपाईप जळाले : सहा फूट उंचीच्या झाडांचा कोळसा, आंबटशौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.पूर्वी ओसाड असलेल्या हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. त्याच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. परिणामी, हनुमान टेकडी परिसराला ‘ऑक्सिजन  पार्क’ अशीच नवी ओळख मिळाली. याच ऑक्सिजन पार्क परिसरात अनेक जण सकाळी फिरायला येत असून रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली.ऑक्सिजन पार्क परिसरात आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.घटनास्थळी पोहोचलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होती. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.यंदाची तिसरी घटनाहनुमान टेकडी परिसरात आग लागल्याची ही यंदाच्या वर्षीची तिसरी घटना आहे.या परिसरात रात्रीच्या सुमारास गांजा, दारू शौकिनांचा डेरा असतो. परंतु, पोलीस प्रशासनातील अधिकारी या आंबट शौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.साटोडा चौक परिसरात ‘दी बर्निंग कार’रिंगरोडवरील साटोडा चौक परिसरात भरधाव असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच कारचालक वेळीच वाहनाबाहेर पडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; पण संपूर्ण कार जळून कोळसा झाली. गिरीश शर्मा असे कारचालकाचे नाव असून तो कांदिवली मुंबई येथील रहिवासी आहे. गिरीश शर्मा हे यवतमाळवरून नागपूरच्या दिशेने एम. एच. ०४ टी.एस.५०४६ क्रमांकाच्या कारने जात असताना ही घटना घडली.शास्त्री चौकातील तीन टपऱ्या जळाल्यावर्धा शहरातील शास्त्री चौक परिसरात रविवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत तीन टपऱ्या जळाल्या. आग लागल्याचे निदर्शनास येताच न.प.च्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत श्रीवास्तव यांच्या मालकीची टपरी तसेच शेजारी असलेल्या गॅस वेल्डिंगच्या व इतर दुसºया दुकानातील साहित्य जळून कोळसा झाल्याने सदर तिन्ही छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.