शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात इतर रुग्ण लॉक डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. विशेत: ६० वर्षाच्या वरील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधी असल्यातरी त्यांना या काळात रूग्णालयात जाण्यासही मोठी अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देडॉक्टरही भेटणे कठीणच : ज्येष्ठ नागरिकांसमोर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ९ मार्चपासून राज्यात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोणाच्या या साथीत इतर आजारांचे रूग्ण घरातच लॉकडाऊन झाल्याचे चित्र शहरी व ग्रामीण भागात दिसून येत आहे.राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर शासकीयस्तरावर कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. २२ मार्चपासून देश पातळीवर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे नागरीक मागील ३ महिण्यांपासून घरातच बंदिस्त झाले आहे. विशेत: ६० वर्षाच्या वरील नागरिकांना विविध प्रकारच्या व्याधी असल्यातरी त्यांना या काळात रूग्णालयात जाण्यासही मोठी अडचण निर्माण झाली आहे.अनेकजण शहरातील खाजगी डॉक्टरांकडे उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, बीपी तपासणे, मणक्याचे आजार यासह अनेक आजाराच्या उपचारासाठी जात होते. मात्र कोरोनाच्या भितीपोटी अशा रूग्णांनी डॉक्टरकडे जाणेही टाळले. बरेच डॉक्टर केवळ मोबाईलवरच औषंधाबाबत माहिती सांगत आहेत.दवाखान्यात येऊ नका, असा थेट सल्ला इतर आजाराच्या रूग्णांना दिला जात आहे. खोकला, सर्दी, ताप या उन्हाळ्यातील नियमित आजारातही डॉक्टरांकडे जाण्याचे अनेकांनी टाळले. सरकारी रूग्णालयात गेल्यास आपल्याला क्वॉरनटाईन करतील. या भितीपोटी जिल्हा रूग्णालयातही अशा जेष्ठ नागरीकांनी जाण्याचे टाळले त्यामुळे खाजगी दवाखान्यासह जिल्हा रूग्णालय तसेच सावंगी व सेवाग्राम रूग्णालयातही इतर आजार रूग्णांची संख्या रोडावलेलीच आहे. काही रूग्णांचे नेहमीच डॉक्टरसुध्दा त्यांना या काळात भेटण्यास बोलाविण्याचे टाळत असल्यांचे दिसते.वर्ध्यांत बहुतांश खासगी दवाखाने बंदचशहरात काही डॉक्टर्स आपले दवाखाने नियमितपणे उघडून रूग्णांवर उपचार करतांना दिसत आहे. मात्र काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले आहे. मोबाईल फोनवरच ते रूग्णांना मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून येत आहे. तर बऱ्याच रूग्णांनी औषध विक्रेत्यांच्या सल्यांनी आपल्या व्याधीवरील नियमीत औषधोपचार घेतला आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या घटलीलॉकडाऊनच्या या स्थितीत ग्रामीण भागात शहराकडे येणाऱ्या रूग्णांचा ओढाही मंदावला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बंद असल्याने यातून अर्ध्या तिकीटवर प्रवास करून अनेक जण रूग्णांलयात येत होते ते सुध्दा लॉकडाऊन झालेत. कोरोनाच्या या साथीत इतर आजार रूग्ण या तीन महिण्यात कमी झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या