शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अवयवदान लोक चळवळ बनविण्यासाठी प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:19 PM

चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देचार युवकांचा पुढाकार : पुणे ते आनंदवन सायकल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : चला करू या अवयव दान.. जपूया माणूसकीचे भान हे घोष वाक्य घेऊन चार युवकांनी सायकलवरून यात्रा काढली आहे. रविवारला सेवाग्राम आश्रमात सायंकाळी सदर युवक पोहचले. अवयवदान ही लोकचळ व्हावी यासाठी पुणे ते आनंदवन अशी सायकल यात्रा करीत असल्याचे चारही युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.किसन ताकमोडे अहमदनगर, गणेश नरसाळे सोलापूर, राजेंद्र सोनवने नाशिक आणि सुरज कदम सातारा हे चार युवक यात सहभागी आहेत. यातील राजेंद्र सोनवने हे व्यवसायिक असून बाकी तिघेजण महाविद्यालयात शिकत आहे.सायकल चालवणे ही कला आनंदासोबत शरीराला व्यायाम देते. तसेच पर्यावरण व आर्थिकदृष्ट्या समर्थ बनविते. हे खरे असले तरी भारता सारख्या देशात सायकल मात्र क्रांती घडवून आणू शकते हे आता सिध्द झालेले आहे. आनंदाला मुकणारे असंख्य आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो आणि तो अवयव दानातून. पण आपल्याकडे मात्र अजूनही अवयवदानाची कल्पना फारशी रूजली नाही. मेल्यावरही आपण जीवंत राहू शकतो. त्यासाठी करावे लागणार अवयवदान. ही संकल्पना घेऊन आम्ही एकत्र आलो आणि पुण्यातील शनिवार वाड्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ केल्याचे सायकलस्वारांनी सांगितले.दिवसाला ७० ते ९० कि.मी.चा प्रवास चारही जण करतात. शाळा, महाविद्यालय, चौक, देऊळ, चहा टपरी, उपहारगृह आणि रात्रीच्या मुक्काम स्थळी आम्ही लोकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. सायकल चालविणे, अवयवदानाचे महत्त्व, पर्यावरण आदीचे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार अधिक रूजावा यासाठी आमची धडपड असल्याचे चौघांनी सांगितले.ही यात्रा राळेगणसिध्दी, स्नेहालय, देवगड, औरंगाबाद, जालना, लोणार, वाशिम, कारंजा, यवतमाळ आणि रविवारला सायंकाळी वर्धेवरून सेवाग्राम येथे पोहचली.महात्मा गांधीजींच्या आश्रमात दर्शन घेऊन प्रेरणा घेतली. नयी तालिम समितीचे कार्यालय मंत्री डॉ. शिवचरण ठाकुर यांनी निवास व भोजनाची व्यवस्था करून कार्यास प्रोत्साहित केले. सोमवारला सकाळी बापूकुटीचे दर्शन घेऊन चारही सायकलस्वार आनंदवन च्या दिशेने रवाना झाले. चला माणूस म्हणून जगू या आणि जगू द्या हा संदेश ते लोकांपर्यंत पोहचविणार आहे. आनंदवन येथे याचा समारोप १९ नोव्हेंबरला होणार आहे.२० ते २२ नोंव्हेबरपर्यंत हेमलकसा येथे मुक्काम करून २३ रोजी नागपूरला आल्यानंतर बसने पुण्याला परतणार आहे. सायकल यात्रेचे दुसरे वर्ष आहे.जेष्ठ समाज सेवक बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्वातून सदर कार्य सुरू आहे. आश्रमात मार्गदर्शिका संगिता चव्हाण यांनी सायकल स्वाराशी संवाद साधून त्यांना आश्रमची माहिती दिली.