शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

२५० महाविद्यालयांना प्रवेश बंदचे आदेश

By admin | Updated: July 29, 2014 23:57 IST

नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता

विद्यापीठ व शासनाच्या जाचक अटी : जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचितवायगाव (नि़) : नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली़ काही महाविद्यालयांत प्रवेश क्षमता कमी असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे़ वर्धा जिल्ह्यात ९७ महाविद्यालये आहेत़ शहरी भागात शाळा अधिक असल्या तरी विद्यार्थ्यांचा ओढाही अधिकच आहे. अनेक महा़चे प्रवेश पूर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थी कुठे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ नागपूर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना पुर्वसूचना न देता २५० महाविद्यालयांना मागील वर्षी प्रवेश बंद करण्याचे आदेश दिलेत़ निर्धारित नियमानुसार वर्गनिहाय तुकडी वाढविली गेली तर वाढणाऱ्या तुकडीसाठी टप्प्याने १०० टक्के प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे, ही अट आहे. पैकी ५० टक्के प्राध्यापक ५ आॅगस्टपूर्वी भरले पाहिजे तर उर्वरित ५० टक्के प्राध्यापक तीन महिन्यांच्या आत भरण्याचे आदेश आहेत़ या आदेशावर अंमल करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापणास कसरत करावी लागत आहे. प्राध्यापकांची नियुक्ती करताना नेट-सेट आणि पीएचडीधारक प्राध्यापकांना वेतन द्यायचे कुठून, असा प्रश्न संस्था व्यवस्थापकांना पडला आहे.व्यवस्थापनाने तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापकांची नियुक्ती केल्यास त्या शिक्षकांना तीन महिन्यानंतर रितसर समाविष्ट करता येईल; पण ५ ते १० हजारांत नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक मिळणार कुठे, हा प्रश्न संस्थांना आव्हान ठरत आहे़ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वाजवी शुल्क घेणेही बंधनकारक केले आहे़ यामुळे प्राप्त शुल्कातूनही प्राध्यापकांना वेतन देणे शक्य नाही. या जाचक अटींमुळे महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश घेतले जातील, अशी मानसिकता संस्थानिकांची आहे़ यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत़ ग्रामीण भागातील काही महाविद्यालये आदेशाचा मान ठेऊन बंद करण्यात आलीत़ याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील विशेषत: मुलींना घरातील मंडळी शहरात शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होत नाही़ यामुळे त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमापासून वंचित राहणार आहे़ विद्यापीठाच्या निर्णयाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसते़(वार्ताहर)