शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

२५० महाविद्यालयांना प्रवेश बंदचे आदेश

By admin | Updated: July 29, 2014 23:57 IST

नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता

विद्यापीठ व शासनाच्या जाचक अटी : जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचितवायगाव (नि़) : नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली़ काही महाविद्यालयांत प्रवेश क्षमता कमी असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे़ वर्धा जिल्ह्यात ९७ महाविद्यालये आहेत़ शहरी भागात शाळा अधिक असल्या तरी विद्यार्थ्यांचा ओढाही अधिकच आहे. अनेक महा़चे प्रवेश पूर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थी कुठे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ नागपूर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना पुर्वसूचना न देता २५० महाविद्यालयांना मागील वर्षी प्रवेश बंद करण्याचे आदेश दिलेत़ निर्धारित नियमानुसार वर्गनिहाय तुकडी वाढविली गेली तर वाढणाऱ्या तुकडीसाठी टप्प्याने १०० टक्के प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे, ही अट आहे. पैकी ५० टक्के प्राध्यापक ५ आॅगस्टपूर्वी भरले पाहिजे तर उर्वरित ५० टक्के प्राध्यापक तीन महिन्यांच्या आत भरण्याचे आदेश आहेत़ या आदेशावर अंमल करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापणास कसरत करावी लागत आहे. प्राध्यापकांची नियुक्ती करताना नेट-सेट आणि पीएचडीधारक प्राध्यापकांना वेतन द्यायचे कुठून, असा प्रश्न संस्था व्यवस्थापकांना पडला आहे.व्यवस्थापनाने तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापकांची नियुक्ती केल्यास त्या शिक्षकांना तीन महिन्यानंतर रितसर समाविष्ट करता येईल; पण ५ ते १० हजारांत नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक मिळणार कुठे, हा प्रश्न संस्थांना आव्हान ठरत आहे़ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वाजवी शुल्क घेणेही बंधनकारक केले आहे़ यामुळे प्राप्त शुल्कातूनही प्राध्यापकांना वेतन देणे शक्य नाही. या जाचक अटींमुळे महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश घेतले जातील, अशी मानसिकता संस्थानिकांची आहे़ यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत़ ग्रामीण भागातील काही महाविद्यालये आदेशाचा मान ठेऊन बंद करण्यात आलीत़ याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील विशेषत: मुलींना घरातील मंडळी शहरात शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होत नाही़ यामुळे त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमापासून वंचित राहणार आहे़ विद्यापीठाच्या निर्णयाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसते़(वार्ताहर)