शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

युद्धाभिमुख राजकारणाला गांधी जिल्ह्याचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:31 AM

पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देपुलवामा शहिदांना श्रद्धांजली : जागतिक शांतीसाठी प्रार्थना, सामाजिक संघटनांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या निषेध करीत वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत ही भावना जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना सभा घेण्यात आली. देशाचे राजकारण ज्याप्रकारे सैनिकीकरणाच्या दिशेने जाते आहे ते धोकादायक असून युद्धज्वर पेटवण्याच्या उन्मादी राजकारणाला आम्ही ठाम विरोध करतो, अशी स्पष्ट भूमिका या संघटनांनी घेतली.या सभेत सर्वच प्रकारच्या दहशतवादी कृतीचा तीव्र निषेध करीत असल्याची भावना व्यक्त करतानाच दहशतवादाविरोधात सर्व देश एकत्रित उभा राहण्याची गरज असल्याची भूमिका मांडण्यात आली. पुलवामा भीषण हल्ल्यासाठी जबाबदार घटकांना सूडबुद्धीने नव्हे तर शांतबुद्धीने शिक्षा झालीच पाहिजे, मात्र निष्पापांचे रक्त न सांडता या गंभीर प्रश्नाचे समाधान शोधायला हवे. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शहिदांच्या बलिदानाचे राजकारण करत सांप्रदायिक तेढ निर्माण करणे, अन्य राज्यांत राहणाऱ्या काश्मिरी जनतेवर हल्ले करणे, असे प्रकार काही भागात सुरु झाले असून ते दहशतवाद्यांच्या पत्थ्यावर पडणारेच आहे. द्वेषभावनेने व प्रांतवादाने ग्रस्त हल्ले थांबवायला हवेत, मात्र युद्ध हा त्यासाठी पर्याय नसावा, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दहशतवादी प्रवृत्तींना सदबुद्धी यावी, जगभरातील नरसंहार टाळावा आणि देशातील विविध धर्म व प्रांतातील लोकांमध्ये बंधुभाव नांदावा, यासाठी यावेळी सर्वधर्म समभाव प्रार्थना आणि विश्व शांतिपाठाचे सामूहिक स्वरात पठण करण्यात आले.या प्रार्थना सभेत आंबेडकरी चळवळीतील विचारवंत प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे, मगन संग्रहालय समितीच्या डॉ. विभा गुप्ता, आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, नई तालीम समितीच्या सुषमा शर्मा, ग्राम सेवा मंडळाच्या ओजस सु. वि. यांनी प्रारंभी भूमिका स्पष्ट केली. प्रशांत नागोसे यांनी यावेळी गीते सादर केली. सभेला करुणा फुटाणे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, अध्ययन भारतीचे हरीश इथापे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, प्रा. किशोर वानखडे, मुरलीधर बेलखोडे, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, सेवा संघाचे रवींद्र कडू, बहार नेचर फाउंडेशनचे राहुल वकारे, फूटपाथ स्कूलचे मोहित सहारे, मालती, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रीती जोशी, सिद्धेश्वर उमरकर, सुधाकर कुमरे, आनंद निकेतनचे पंडित चांनोळे, मनोज ठाकरे, दिनेश प्रसाद, गणेश बोरकर, मंगला नागोसे, प्रफुल्ल नागोसे, ज्योती माकनवार, संदीप माकनवार, सतीश साम्रतवर, विजय डगवार, अंकित बारंगे उपस्थित होते.