शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ ४५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:45 IST

अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : जलाशयेही रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ९२०.७१ च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. यंदा १६ आॅगस्टपर्यंत केवळ ४५.२५ टक्केच पाऊस झालेला आहे. आणखी दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला असून या कालावधीत पर्जन्यमान व्यवस्थित न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाची शक्यता आहे.वर्धा तालुक्यात सरासरी ८८९.४० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंत केवळ २४२.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावीत वर्धा तालुक्यात ४७५.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सेलू तालुक्यात जून ते सप्टेंबर या काळात ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट पर्यंत तालुक्यात २३८.२० मि.मी. पाऊस झालेला आहे. १६ आॅगस्ट पर्यंत तालुक्यात ५७९.४७ मि.मी. पाऊस झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. देवळी तालुक्यात सरासरी ९५९.६२ मि.मी. पाऊस पडतो. येथेही आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९३.२४ पाऊस झाला आहे. सेलू व देवळी तालुक्यात सरासरी ३९.६१ व ४८.६० टक्केच पाऊस पडला आहे. हिंगणघाट तालुक्यात ९७५.७० मि.मी. पाऊस चार महिन्यात पडतो. १६ आॅगस्टपर्यंत हिंगणघाट तालुक्यात ६१४.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात ३६.९८ टक्के पाऊस झाला आहे. समुद्रपूर तालुक्यात चार महिन्यात १००१.६२ मि.मी. पाऊस पडतो. आॅगस्ट महिन्याच्या मध्यार्धापर्यंत ५०८.९७ पावसाची नोंद झाली. या तालुक्यात ४९.१९ टक्के पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यात ८५०.३० मि.मी. पडतो. आॅगस्ट महिन्यापर्यंत ४९१.५३ मि.मी पाऊस झाला. या तालुक्यात केवळ ४२.१९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. आष्टी तालुक्यात चार महिन्यात ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ४२०.९९ मि.मी. पाऊस झाला. येथे ५१.३२ टक्के पाऊस झाला आहे. तर कारंजा तालुक्यात चार महिन्या ८६४.७२ मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्टपर्यंत ४४८.५४ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. येथे ४८.१३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ९२०.७१ मि.मी.च्या सरासरीने ७३६५.७० मि.मी. पाऊस पडतो. १६ आॅगस्ट ५०४.०८ च्या सरासरीने ४०३२. ६७ मि.मी. झाला. जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई