शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
5
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
6
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
7
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
8
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
9
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
10
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
11
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
12
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
13
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
14
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
15
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
16
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
17
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
18
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
19
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
20
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ

वर्ध्यातील केवळ २२ बाधित शेतकऱ्यांना मिळणार मदत ! जमीन गेली १३ हजार हेक्टर वाहून; प्रशासन म्हणत केवळ दोन हेक्टर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:06 IST

Wardha : पुरामुळे जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. आता पीक घेण्यासाठी सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, प्रशासनाच्या लेखी अहवालात सप्टेंबरमध्ये केवळ १.८ हेक्टरच शेतजमीन खरडून गेली. केवळ १०.९ हेक्टरवरील शेतजमिनीत गाळ साचला आहे, असे म्हटले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच नाही का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पुरामुळे जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. आता पीक घेण्यासाठी सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुरामुळे वर्धा, सेलू, देवळी तालुक्यातील पाच हजार ४०० हेक्टरवरील माती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे सांगितले जाते. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील चार हजार ६०० हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेली. हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातही तीन हजार हेक्टरवरील माती पुरामध्ये वाहून गेल्याचे सांगण्यात येते.

कृषी विभागाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने किती जमीन खरडून गेली, जमिनीत किती गाळ साचला, याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार वर्धा तालुक्यात ४५ हेक्टर, तर देवळी तालुक्यात १.२५ हेक्टर, अशा एकूण १.७ हेक्टर क्षेत्रावरील माती खरडून, वाहून गेल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन तालुक्यांतील केवळ चार शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाईनुसार केवळ ७९ हजार ९०० रुपये मदत मिळणार आहे.

केवळ ११ हेक्टरमध्ये साचला गाळ

कृषी विभागाच्या सप्टेंबर महिन्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील केवळ १०.९ हेक्टरवरील शेतीत तीन इंच किंवा त्यापेक्षा जास्त गाळ साचला आहे. यात केवळ हिंगणघाट तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या शेतीत गाळ साचल्याचे स्पष्ट करण्यात आले. २ या १८ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांप्रमाणे एक लाख ९६ हजार २०० रुपयांची मदत मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अहवालानुसार शेती खरडून जाणे आणि गाळ साचण्याच्या निकषानुसार जिल्ह्यातील केवळ २२ शेतकऱ्यांना दोन लाख ७६ हजार १०० रुपयांची मदत मिळेल, असे दिसून येत आहे.

सोयाबीनची झाली माती, कपाशीची बोंडे सडली

अतिवृष्टीमुळे सोयाबीनची माती झाली आहे. कपाशीची बोंडे सडली आहेत. त्यामुळे यंदा उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यांना दरवर्षी नवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. शासन तेवढ्यापुरते आश्वासन देते. मात्र, त्याची पूर्तता होताना दिसत नाही. शासनाने नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला पुरेशी मदत देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नदी, नाल्यांकाठावरील पिकांना फटका

नदी आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. जमिनी, तसेच पिके खरडून गेली. बांधबंधिस्ती उद्ध्वस्त झाली. अतिवृष्टीमुळे सुपीक माती वाहून गेली. माती वाहून गेल्यामुळे सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.

"सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचे तालुकानिहाय अहवाल मागविण्यात आले. त्या अहवालानुसार जिल्ह्यातील स्थिती किती शेतजमीन खरडून गेली, किती जमिनीत गाळ साचला, याबाबत माहिती सादर करण्यात आली आहे."- रमाकांत कांबळे, प्रभारी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा

English
हिंदी सारांश
Web Title : Wardha Farmers Devastated: Minimal Aid for Massive Land Erosion

Web Summary : Wardha farmers face ruin from heavy rains, losing fertile soil. Despite significant land erosion, official reports claim minimal damage. Affected farmers are receiving meager compensation, deepening their distress and raising questions about governmental support effectiveness.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ