शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दुचाकीची मालवाहूला धडक, एक गतप्राण; नागपूर-अमरावती महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 17:24 IST

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहूवर चढविली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

वर्धा : पेट्रोल पंपावरून इंधन भरून महामार्ग ओलांडताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकी चालक ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग बावरी याने आपल्या ताब्यातील एम. एच. ३० बी. के. १२८२ क्रमांकाची दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहूवर चढविली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील आष्टी टि-पाईंटवर परिसरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.

ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग ददारसिंग बावरी हा मूळचा देवीखदान अकोला येथील रहिवासी आहे. तो त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन आष्टी टि-पॉईंंट परिसरात आला असता मद्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या एम. एच. ३० बी. डी. २५५१ क्रमांकाच्या मालवाहूला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चुराडाच झाला, तर मालवाहूचा पुढील भाग चपकला.

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांसह तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शिवाय जखमीला रुग्णालयाकडे रवाना केला, पण वाटेतच गंभीर जखमीची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी तळेगाव पोेलिसांनी मालवाहूचालक शेख असलम रा. मूर्तीजापूर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी राजू शाहू, संदीप महाकाळकर, रमेश पर्बत, अमोल इंगोले करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक