शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पोलिस कर्मचाऱ्यांकडून वृद्धास जबर मारहाण, पैसे न दिल्यामुळे मारल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 14:52 IST

नातेवाइकांची पत्रपरिषदेत माहिती

सेलू (वर्धा) : पाच हजारांऐवजी केवळ तीनच हजार रुपये दिल्याच्या कारणामुळे घोराड येथील ५८ वर्षीय वृद्धास पोलिस कर्मचाऱ्याने जबर मारहाण केली. मधुमेहाच्या आजाराने पीडित असलेला वृद्ध मारहाणीनंतर अत्यवस्थ झाल्याने तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. त्यामुळे पैशासाठी वाट्टेल ते करणाऱ्या ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितासह कुटुंबातील सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली. कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक आता याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घोराड येथील गोविंद जाधव यापूर्वी अवैध व्यवसाय करायचे, परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून मधुमेहाच्या आजारामुळे त्यांनी अवैध व्यवसायाला कायमस्वरूपी रामराम ठोकला. त्यांचा अवैध व्यवसाय सुरू असावा, या उद्देशाने सेलू पोलिस ठाण्यातील विजय कापसे नामक कर्मचारी रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचला. यावेळी ते स्वत: देखील मद्यधुंद अवस्थेत होते हे विशेष. त्यांनी जाधव यांना ‘पाच हजार रुपये दे, अन्यथा तुला अंदर टाकतो’, असे म्हणून त्यांना आपला पोलिसी खाक्या दाखवला. परंतु, त्यांचा व्यवसायच ठप्प असल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली.

हाच राग मनात धरून कापसे यांनी त्यांना फरफटत पोलिस ठाण्यात नेले. तेथील आपल्या क्वार्टरमध्ये आत नेले आणि ‘सांग पैसे देते का, ठोकू केस’ म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या जाधव यांनी आपल्या घरी फोन करून कसेबसे तीन हजार रुपये आणून कापसे यांना दिले. परंतु, त्याची हाव काही संपतच नव्हती. त्यांनी जाधव यांना खाली जमिनीवर पाडले आणि बुटाच्या साहाय्याने त्यांच्या पाठीवर आणि हाताला मारहाण केली, असा आरोप पत्रकार परिषदेत केला.

जाधव आधीच मधुमेहाच्या आजाराने बाधित असल्याने आणि वेळेवर इन्सुलिन न मिळाल्याने ते पोलिस ठाण्यातच अत्यवस्थ झाले. शेवटी कुटुंबातील सदस्यांनी पोहोचून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी सेवाग्रामला हलविण्याच्या सूचना केल्याने सेवाग्रामला दाखल करण्यात आले. तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नी व मुलगी तक्रार देण्याकरिता पोलिस ठाण्यात गेल्यानंतर रात्रभर ताटकळत ठेवून पहाटे चार वाजता कशीबशी तक्रार दाखल करून घेतली, असेही यावेळी सांगण्यात आले.

यादरम्यान तेथे उपविभागीय पोलिस अधिकारी देखील येऊन गेल्याचे कळते. अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या हप्तेखोर, निर्दयी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पीडित परिवारातील सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली. या घटनेशी संबंधित मारहाणीचा आरोप असलेले पोलिस कर्मचारी विजय कापसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चार वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘धंदा करा आणि हप्ता द्या’, अवैध धंद्यांना घालताहेत खतपाणी?

अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक अहोरात्र प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांचेच काही कर्मचारी प्रामाणिक प्रयत्नांना गालबोट लावत आहेत. कारवाईच्या नावाखाली स्वत:च दारू ढोसून आपला रुबाब झाडत आहे. ‘धंदा करा आणि हप्ता द्या’ यासाठी पोलिसच अवैध व्यवसायाला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी येथील कोणता पोलिस कर्मचारी अवैध व्यावसायिकांकडून किती रक्कम घेतो, याची ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. तरीही सर्व काही ‘ऑल इज वेल’ असल्याचे भासविले जात असून हा प्रकार कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षकांच्या प्रामाणिकतेला नख लावणारा आहे.

घटनेच्या दिवशी मी पोलिस ठाण्यात नव्हतो. तशीही माझी आता बदली झाली आहे. सध्या मी समृद्धी मार्गावर बंदोबस्तात आहे. त्यामुळे याप्रकरणी मला काही सांगता येणार नाही.

- रवींद्र गायकवाड, ठाणेदार, पोलिस स्टेशन, सेलू.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwardha-acवर्धा