शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

एका महिन्यात चोरट्यांनी चार रोहित्रातील ऑईल नेले चोरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 16:35 IST

शेती पंपाला वीज पुरवठा करण्याऱ्या विद्युत रोहित्राला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले असून एका महिन्यात ८०० ते १००० लीटर ऑईल चोरट्यांनी चोरून नेले आहे.

वर्धा : येथील शेत शिवारातील मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी महावितरणच्या वीज रोहित्राला लक्ष्य केले असून एका महिन्यात आतापर्यंत चार रोहित्रातले ऑईल चोरून नेले आहे. परिणामी या परिसरातील अनेक वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरणला अडचण निर्माण झाली आहे.

दुर्गापूर माैजातील १५ शेतकऱ्यांचा वीजपुरवठा यामुळे बंद आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून पिकांना पाणी देणे गरजेचे असतांना ऐन हंगामातच वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणकडून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

आपला जीव धोक्यात घालून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. या परिसरातील शेती पंपाला वीज पुरवठा करण्याऱ्या विद्युत रोहित्राला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले असून एका महिन्यात ८०० ते १००० लीटर ऑईल चोरट्यांनी चोरून नेले आहे. तेव्हा शेतकऱ्यांसोबतच महावितरणला देखील अखंडित वीज पुरवठा ठेवताना नाकीनऊ येऊ लागले आहेत.

चालू वीज रोहित्र बंद करून. यातील ऑईल चोरुन चोरटे पसार होतात. एका महिन्यात तळेगाव परिसरात अशाप्रकारच्या आतापर्यंत ४ रोहित्रांतील ऑईल चोरीच्या घटना घडल्या असून या आधीसुद्धा अनेकवेळा अशाप्रकारच्या घटना परिसरात घडल्या आहेत. यात महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकरणात महावितरणकडून रितसर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या रोहित्रातील ऑईल चोरीचा एकही तपास लागला नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावले आहे.

चालू वीज वाहिनीवर काम करणे हे धोकादायक आहे. पण चोरटे आपला जीव धोक्यात घालून आपला कार्यभाग साधत आहेत. ग्रामीण भागातील शेती पंपाला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेचे जाळे निर्माण केले आहे. शेती पंपाना वीजपुरवठा करणारे रोहित्र बहुतांश ठिकाणी निर्जन आणि निर्मनुष्य ठिकाणी असल्याने चोरांना चोरी करणे सोपे झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी