शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कोरोना मृताच्या नावे अनेकदा ‘सानुग्रह’चा लाभ; वारसदारांना ३१.५० लाख परत करण्याचे आदेश

By चैतन्य जोशी | Updated: August 31, 2022 10:32 IST

वर्धा जिल्ह्यात ३१.५० लाख झाले अतिरिक्त जमा

चैतन्य जोशी

वर्धा : कोरोनाने मृत पावलेल्या एकाच मृतकाच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम एकदाच नव्हे तर दोन ते तीन वेळा जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आता अतिरिक्त जमा झालेले तब्बल ३१ लाख ५० हजार रुपये सात दिवसांच्या आत रक्कम न परत केल्यास संबंधित लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव संजय धारूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिले आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोरोना मृतांच्या वारसदारांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची योजना अमलात आणली होती. वर्धा जिल्ह्यातून २ हजार ४९८ अर्ज ऑनलाइन दाखल झाले होते. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ऑनलाइन अर्जाची पडताळणी व त्रुटी तपासून १७२ अर्ज रद्द केले होते. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुसऱ्या तपासणीत २७१ अर्ज रद्द करण्यात आले होते. एकूण १,७७८ वारसदारांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर लक्षात आले की, २७ मृतकांच्या २७ नातलगांच्या खात्यात ही रक्कम जमा करणे आवश्यक होते. मात्र एकाच मृतकाच्या दोन ते तीन नातलगांच्या बँक खात्यात याप्रमाणे २७ वारसांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल ६३ जणांच्या खात्यात अनुदान जमा झाले.

अशी होती प्रक्रिया

लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा होता. अर्जासोबत मृतकाचे आधार कार्ड, नातलगाचे आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचे कारण असल्याचा दाखला, तसेच अर्जदाराच्या बँकेच्या डिटेल्स ऑनलाइन अपलोड करायचे होते. पहिले जिल्हा शल्यचिकित्सक आणि नंतर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय त्यानंतर ते अर्ज मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे पाठविले गेले आणि तेथून सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले.

निधी वितरणात असा झाला घोळ

एकाच मृतकाच्या विविध नातलगांनी अर्ज केले होते. सर्वच अर्जांचा डेटा ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आला. अनुदान वितरित करण्यासाठी सरकारने सॉफ्टवेअर विकसित केले होते. सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये गेल्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया बँकेतील माहितीच्या आधारे करण्यात आली. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये एकाच मृतकाचे नाव वारंवार येणे, एकाच मृतकाच्या नातलगांचे अर्ज किती हे शोधू शकेल, अशी सुविधा नव्हती. त्यामुळे हा घोळ झाला.

सानुग्रह अनुदान एकाच मृतकाच्या दोन ते तीन वारसांच्या बँक खात्यात जमा झाल्याची बाब उजेडात आली. चुकीने ज्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले त्यांना ते अनुदान परत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अनुदान न परत केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये कारवाई केली जाईल.

- किशोर सोनटक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग.

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfundsनिधीwardha-acवर्धाGovernmentसरकार