शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

एकाच कोरोना मृताच्या नावे अनेकदा ‘सानुग्रह’चा लाभ; वारसदारांना ३१.५० लाख परत करण्याचे आदेश

By चैतन्य जोशी | Updated: August 31, 2022 10:32 IST

वर्धा जिल्ह्यात ३१.५० लाख झाले अतिरिक्त जमा

चैतन्य जोशी

वर्धा : कोरोनाने मृत पावलेल्या एकाच मृतकाच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम एकदाच नव्हे तर दोन ते तीन वेळा जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आता अतिरिक्त जमा झालेले तब्बल ३१ लाख ५० हजार रुपये सात दिवसांच्या आत रक्कम न परत केल्यास संबंधित लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव संजय धारूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिले आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोरोना मृतांच्या वारसदारांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची योजना अमलात आणली होती. वर्धा जिल्ह्यातून २ हजार ४९८ अर्ज ऑनलाइन दाखल झाले होते. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ऑनलाइन अर्जाची पडताळणी व त्रुटी तपासून १७२ अर्ज रद्द केले होते. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुसऱ्या तपासणीत २७१ अर्ज रद्द करण्यात आले होते. एकूण १,७७८ वारसदारांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर लक्षात आले की, २७ मृतकांच्या २७ नातलगांच्या खात्यात ही रक्कम जमा करणे आवश्यक होते. मात्र एकाच मृतकाच्या दोन ते तीन नातलगांच्या बँक खात्यात याप्रमाणे २७ वारसांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल ६३ जणांच्या खात्यात अनुदान जमा झाले.

अशी होती प्रक्रिया

लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा होता. अर्जासोबत मृतकाचे आधार कार्ड, नातलगाचे आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचे कारण असल्याचा दाखला, तसेच अर्जदाराच्या बँकेच्या डिटेल्स ऑनलाइन अपलोड करायचे होते. पहिले जिल्हा शल्यचिकित्सक आणि नंतर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय त्यानंतर ते अर्ज मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे पाठविले गेले आणि तेथून सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले.

निधी वितरणात असा झाला घोळ

एकाच मृतकाच्या विविध नातलगांनी अर्ज केले होते. सर्वच अर्जांचा डेटा ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आला. अनुदान वितरित करण्यासाठी सरकारने सॉफ्टवेअर विकसित केले होते. सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये गेल्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया बँकेतील माहितीच्या आधारे करण्यात आली. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये एकाच मृतकाचे नाव वारंवार येणे, एकाच मृतकाच्या नातलगांचे अर्ज किती हे शोधू शकेल, अशी सुविधा नव्हती. त्यामुळे हा घोळ झाला.

सानुग्रह अनुदान एकाच मृतकाच्या दोन ते तीन वारसांच्या बँक खात्यात जमा झाल्याची बाब उजेडात आली. चुकीने ज्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले त्यांना ते अनुदान परत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अनुदान न परत केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये कारवाई केली जाईल.

- किशोर सोनटक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग.

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfundsनिधीwardha-acवर्धाGovernmentसरकार