शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७५ नव्हे ११७ नद्या होतेय 'अमृतवाहिन्या'

By महेश सायखेडे | Updated: March 19, 2023 18:25 IST

सोलापूरच्या 'कासाळ गंगा'चा अहवाल शासनाला सादर

वर्धा: ‘चला जाणूया नदीला’ हे घोषवाक्य केंद्रस्थानी ठेवून राज्यातील ७५ नद्यांना अमृतवाहिन्या बनविण्याचा मानस उराशी बाळगून नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्धा येथे श्रीगणेशा करीत हाती घेण्यात आला आहे. सेवाग्राम येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपआपल्या कार्यक्षेत्राच्या दिशेने स्वयंसेवक रवाना झाल्यावर प्रत्यक्ष कृती करतेवेळी उपक्रमात सहभागी नद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत राज्यातील गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा व पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण ११७ नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. संबंधित नद्यांची सद्य:स्थितीची माहिती गोळा करून या नद्या निर्मल कशा होईल या दृष्टीने सूक्ष्म आराखडा तयार करून तो प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील महूद तालुका सांगोला येथील कासाळ गंगा नदीचा प्रस्ताव ग्रामस्थांच्या माध्यमातून ३ मार्चला शासनाला सादर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कासाळ गंगा नदीचा लोक अभ्यास व कृती अहवालात सोलापूर जिल्ह्यातील ७१ पाझर तलाव पुनर्जीवन करणे यासह विविध मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पाझर तलावांचे पुनर्जीवन झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढच होणार आहे.

७० टक्के नद्यांचा संवाद पूर्णचला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत ११७ नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहे. ११७ पैकी ७० टक्के नद्यांची संवाद यात्रा आतापर्यंत पूर्ण झाली आहे, तर उर्वरित नद्यांची संवाद यात्रा झटपट पूर्ण करून लोक अभ्यास व कृती अहवाल एप्रिल अखेरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर होणार असल्याचे सांगण्यात आले.

'धाम'च्या संवाद यात्रेचा सोमवारी श्रीगणेशा

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील धाम, वणा व यशोदा या तीन नदींचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी धाम नदीची संवाद यात्रा सोमवार २० मार्चपासून धाम नदीचे उगमस्थळ असलेल्या कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून सुरू होणार आहे. नदी काठावरील ४५ गावांची परिक्रमा करीत लोक अभ्यास पूर्ण करीत कृती अहवाल तयार केला जाणार आहे. यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे, अभियानाच्या नोडल अधिकारी सुप्रिया डांगे, मंगेश वरकड, भरत महोदय, सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

चला जाणूया नदीचा या उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून धाम नदीच्या संवाद यात्रेचा शुभारंभ होत आहे. वर्धा जिल्ह्यातील तिन्ही नद्यांचा लोक अभ्यास व कृती अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शासनाला सादर करण्याचा मानस आमचा आहे.- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :riverनदीMaharashtraमहाराष्ट्रwardha-pcवर्धा