स्वच्छता अभियानात धाम नदीचे पात्र होणार निर्मळ
By Admin | Updated: January 13, 2015 23:04 IST2015-01-13T23:04:18+5:302015-01-13T23:04:18+5:30
येथील धाम नदीच्या पात्रात होत असलेल्या मूर्ती विसजर्नासह विविध कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. या घाणीमुळे नदीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. धाम नदीला विनोबा भावे

स्वच्छता अभियानात धाम नदीचे पात्र होणार निर्मळ
पवनार : येथील धाम नदीच्या पात्रात होत असलेल्या मूर्ती विसजर्नासह विविध कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. या घाणीमुळे नदीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. धाम नदीला विनोबा भावे यांच्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्या नदीची स्वच्छता करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शिवाय त्याला जिल्हा प्रशानाकडून स्वच्छता अभियान जोडण्यात आले आहे. यामुळे बुधवारी सकाळी १० वाजता या स्वच्छता अभियानात जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह खासदर, आमदार व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
गावाच्या शेजारून वाहणारी धाम नदी जिल्ह्यात एक शुद्ध व पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या नावारूनच आचार्य विनोबा भावे यांनी त्या परिसराला परमधाम असे नाव दिले. या नदीवर उत्तरक्रियेचे कार्य केले जाते, वर्धा शहराला पाणी पुरवठाही केला जातो, परिसरातील गुरे, ढोरेही आपली तृष्णा याच नदीच्या पाण्याने भागवीत असतात. अशा या पवित्र नदीचे अस्तीत्व मात्र आता धोक्यात आले आहे. निर्माल्यामुळे नदी प्रदुषित झालेली आहे. परिसरात जिकडे पहावे तिकडे कचराच कचरा विखूरलेला दिसतो.
नदीचे पावित्र्य कायम राहावे हा विचार ग्रा.पं. प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे व गावकऱ्यांनीही त्याला पाठबळ दिल्यामुळे प्रशासनाने नदी व आश्रम परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. उद्या बुधवारी (दि.१४) सकाळी १० वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे. या मोहिमेमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्यासह नागरिक सहभागी होणार आहे.(वार्ताहर)