शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

जनावरांना होणाऱ्या ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजाराने मनुष्यही प्रभावित; वर्धा जिल्ह्यात ९ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’

By चैतन्य जोशी | Updated: September 8, 2022 14:15 IST

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

वर्धा : जनावरांना होणारा ‘लेप्टोस्पायरोसीस’ हा आजार आता माणसांनाही होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात ९ जणांचे अहवाल लेप्टोस्पायरोसीस पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आरोग्य विभागाच्या चमूने नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यास सुरुवात केली आहे.

जनावरांवर या रोगांचे आक्रमण झाल्याने जिल्ह्यातील पशुपालकांवर संकट कोसळले आहे. आरोग्य विभागाच्या चमूने जनावरांची तपासणी केली असता जनावरांना या आजाराने ग्रासल्याचे पुढे आले. ज्या गावातील जनावरांना या रोगाचे लक्षण आहे, तेथील जे लोक आजारी आहेत, त्यांचे रक्त नमुने संकलित केले असता ९ जणांना लेप्टोस्पायरोसीस आजाराने ग्रासल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यामध्ये आर्वी तालुक्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रसुलाबाद येथील ४, तर खरांगणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दासगाव गोंडी येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांचे रक्त नमुने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यावर ९ रुग्ण ‘लेप्टोस्पायरोसीस’ आजाराने ग्रासल्याची माहिती पुढे आली आहे.

आजाराची लक्षणे काय ?

जनावरांच्या संपर्कात आल्याने हा आजार जडण्याची भीती आहे. छोट्या कीटकांकडून पायावर दंश झाल्याने हा आजार होतो. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. तीव्र ताप, अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. पाराडकर यांनी केले आहे.

आता माणसांनाही ग्रासले

हिंगणघाट तालुक्यातील उमरी येडे येथे पाच जनावरांचा लेप्टाेस्पायरोसीस आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर जि. प. पशुसंवर्धन विभागामार्फत गावातील सर्व जनावरांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १९ जनावरांना थायलेरिओसीस हा आजार असल्याचे लक्षात आले. जिल्ह्यात आतापर्यंत २२ जनावरांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५ जनावरांचा थायलेरिओसीसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

रक्त नमुने पाठविले सेवाग्राम रुग्णालयात

लेप्टोस्पायरोसीस आजाराची लागण आता मनुष्यालाही होत असल्याचे पुढे आले आहे. काहींचे रक्त नमुने सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. आर्वी तालुक्यातील रोहणा आरोग्य केंद्रात रसुलाबाद येथील ४ रुग्ण, खरांगणा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दासगाव गोंडी येथील ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आर. जे. पाराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.

टॅग्स :Healthआरोग्यwardha-acवर्धा