शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
4
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
5
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
6
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
7
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
8
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
9
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
10
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
11
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
12
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
13
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
14
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
15
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
16
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
17
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
18
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
19
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
20
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

पर्यावरणासाठी वृक्ष संगोपन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:41 PM

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून गत दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : वृक्ष लागवड विषयी आढावा बैठक; घराशेजारीच उपलब्ध करून दिलेय रोपटे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून गत दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. त्यासाठी जिल्ह्यातही ठिकठिकाणी १ ते ३१ जुलैदरम्यान वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्हा कुठेही कमी पडता कामा नये. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष संगोपन गरजेचेच आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. सदर बैठकीला आ. डॉ. पंकज भोयर, उपवन संरक्षक सुनील शर्मा, संजय इंगळे तिगांवकर, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, वृक्ष मित्र मुरलीधर बेलखोडे आदींची उपस्थिती होती. आ. डॉ. भोयर यांनी वृक्ष लागवडी संदर्भात वनविभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेतली. यावर्षी जिल्ह्यात २७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याची माहिती उपवन संरक्षक सुनील शर्मा यांनी दिली. शासनाचे विविध विभाग, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. घरगुती वृक्ष लागवडीसाठी १२७८७ सामाजिक संस्था, १,२२०८०, बांधकाम विभाग व ३८,११०, केंद्र शासनाचे कार्यालय १७,२३०, उद्योग ५०,०००, एफडी विभाग ७,९५,०००, एसएफडी ५ लक्ष, कृषी विभाग ३,१२६२५, शहरी विकास विभाग २०,६७५, गृहविभाग ४१,०९०, उद्योग विभाग ५,१७०, न्यायालय ४८२५, आदिवासी विभाग ५,७९५, उर्जा विभाग ५४२५, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ४४८०, पाणी पुरवठा विभाग १,०७,५३५, ग्रामपंचायत ५,६७३२० व अन्य विभागाने याप्रमाणे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाने नागरिकांच्या घरा शेजारी रोपटे उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगितले.प्रत्येक विभागाकडून खड्डे खोदण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरूजिल्ह्याला देण्यात आलेल्या वृक्ष लागवडीबाबतच्या उद्दीष्टाच्या पूर्ती करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व विविध शासकीय कार्यालयाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. वृक्षारोपणासाठी ठिकठिकाणी खड्डेही खोदण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य घेत वरिष्ठांनी दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त रोपटे ठिकठिकाणी लावण्यासाठीच सध्या प्रयत्न होत असल्याचेही बैठकीदरम्यान सांगण्यात आले. आतापर्यंत वृक्षलागवडीसाठी दिलेल्या उद्दीष्टापैकी ८० टक्के खड्डे खोदण्याचे काम झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.आमदारांच्या हस्ते ‘रोपटे आपल्या दारी’चा श्रीगणेशावर्धा - स्थानिक आर्वी नाका परिसरात आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते वन विभागाच्या ‘रोपटे आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या परिसरात एक वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, सामाजिक वनिकरणचे डी. एन. जोशी, सहाय्यक वनसंरक्षक काळे, सुहास बढेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, एस. डी. भेंडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एस. डी. भेंडे यांनी केले. यशस्वीतेकरिता वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी विशेष सहकार्य केले.