संशोधित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज
By Admin | Updated: May 15, 2014 01:44 IST2014-05-15T01:44:11+5:302014-05-15T01:44:11+5:30
शासकीय बांधकाम तंत्रज्ञानाकरिता विविध राज्यातील संशोधित केलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन हुडकोचे माजी प्रमुख व्ही. सुरेश यांनी केले.

संशोधित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज
कार्यशाळा : व्ही. सुरेश यांचे विचार
वर्धा : शासकीय बांधकाम तंत्रज्ञानाकरिता विविध राज्यातील संशोधित केलेल्या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन हुडकोचे माजी प्रमुख व्ही. सुरेश यांनी केले.
दत्तपूर येथील ग्रामोपयोगी विज्ञात केंद्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा) अंतर्गत इतरत्र बांधकामासाठी किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञानाच्या वापराबाबत राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यशाळेचे समन्वयक ग्रामीण विकास विभागाचे जी. एन. शर्मा, राज्याच्या उपसचिव आर. विमला, नागपूरचे मुत्थुकृष्णन शंकरनारायण, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या उर्मिला राजाध्यक्ष, पश्चिम बंगालचे कार्यकारी अभियंता दीपनकर चक्रवर्ती, सुमित मुजुमदार, रूपम दीभारामा, आंध्रचे के. धनराज, नाईक, मालपानी आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सुरेश म्हणाले, शासकीय योजनांच्या बांधकामात अंतभरूत असलेले अंगणवाडी, पंचायत भवन, शाळा, धान्य गोदाम आदी इमारतीच्या बांधकामाकरिता उपलब्ध काँक्रीट तंत्रज्ञानापेक्षा संशोधित तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. पर्यायी तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक कुशल, अकुशल कारागीर, उपलब्ध बांधकाम साहित्य यांचा उपयोग करून मनरेगा योजना यशस्वीपणे राबविण्यात येऊ शकते. मनरेगांतर्गंत पारंपरिक बांधकामाला पर्याय म्हणून नवीन पद्धत अवलंबता येते, असे पॉवरपॉइंटच्या साहाय्याने त्यांनी पटवून दिले.
कोलकाताचे रबी मुखोपाध्याय यांनी पूवरेत्तर राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध बांबूचा उपयोग बांधकामासाठी कुशलतेने केला जात ंअसल्याचे सांगितले. त्याचबरोबर बांबू तंत्रज्ञान वापराबाबत अमृत देशपांडे, वैभव काळे, सुनील देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले.
राज्याध्यक्ष यांनीही संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत पर्यायी बांधकाम तंत्रज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रामार्फत कार्यकारी संचालक डॉ. सोहम पंड्या, अभियंता आशिष तळवेकर यांनी मातीच्या भिंती, कोनिकल टाइल्सचे छत याबाबत प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले. केरळमधील साजन यांनी उंदरासाठी पिंजरा, छताचा भराव या राज्यातील प्रचलित तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.
कार्यशाळेचे समन्वयक जी. एन. शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेकरिता आयुक्त कार्यालयातील सहआयुक्त भगत, मिनियार, संचालक खोडके, वर्धा येथील मनरेगाचे उपजिल्हाधिकारी सुनील रहाणे, धर्माधिकारी, बोरकर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक सुधीर पारगावकर, उपसंचालक राजेंद्र साहू, पंकज लव्हाळे आदींनी सहकार्य ंकेले.(शहर प्रतिनिधी)