शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दिवाळी बोनस पिकावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि थांबून थांबून होणारा मुसळधार पाऊस याचा परिणामही उभ्या सोयाबीन पिकावर होत आहे.

ठळक मुद्देउताऱ्यातही येणार घट : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, कृषी विभागही दुर्लक्ष करण्यात मानतोय धन्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख असून यंदा मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवडही जिल्ह्यातील शेतकºयांनी केली आहे. परंतु, सध्या याच पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठ दिवस ढगाळी वातावरण बाजूला सारून ऊन पडली नाही तर सोयाबीनच्या शेंगा पाहिजे त्या प्रमाणात भरणार नाही. सध्या थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेले सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगाच देणार आहे. शिवाय उताऱ्यात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि थांबून थांबून होणारा मुसळधार पाऊस याचा परिणामही उभ्या सोयाबीन पिकावर होत आहे. सेलू तालुक्यासह देवळी आणि आर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये उंटअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.असे असले तरी सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा कृषी विभागाचे अधिकारी कपाशी उत्पादकांना मार्गदर्शन करण्यावरच भर देत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही राजकीय पुढाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचेही वयोवृद्ध शेतकरी सांगतात. मागील वर्षी सोयाबीनचा एकरी पाच ते सहा पोत्याचा उतारा आला होता. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे तीन ते चार पोती असाच उतारा येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकºयांकडून वर्तविला जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.उघाड ठरेल नवसंजीवनीजिल्ह्यातील ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून होत असलेला मुसळधार पाऊस यामुळे सध्या सोयाबीनच्या शेंगा पाहिजे त्या प्रमाणात भरल्या नसल्याचे शेतकरी सांगतात. पुढील आठ दिवस ढगाळी वातावरण हटून जिल्ह्यात उघाड राहिल्यास सोयाबीन पिकाला नवसंजीवनीच मिळेल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.कार्यालयात बसून केले जातोय सर्वेक्षण?कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यालयात बसूनच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करीत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी