शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी बोनस पिकावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि थांबून थांबून होणारा मुसळधार पाऊस याचा परिणामही उभ्या सोयाबीन पिकावर होत आहे.

ठळक मुद्देउताऱ्यातही येणार घट : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, कृषी विभागही दुर्लक्ष करण्यात मानतोय धन्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख असून यंदा मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवडही जिल्ह्यातील शेतकºयांनी केली आहे. परंतु, सध्या याच पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठ दिवस ढगाळी वातावरण बाजूला सारून ऊन पडली नाही तर सोयाबीनच्या शेंगा पाहिजे त्या प्रमाणात भरणार नाही. सध्या थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेले सोयाबीन पीक शेतकऱ्यांना दगाच देणार आहे. शिवाय उताऱ्यात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. नियोजन क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात असलेले ढगाळ वातावरण आणि थांबून थांबून होणारा मुसळधार पाऊस याचा परिणामही उभ्या सोयाबीन पिकावर होत आहे. सेलू तालुक्यासह देवळी आणि आर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये उंटअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.असे असले तरी सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा कृषी विभागाचे अधिकारी कपाशी उत्पादकांना मार्गदर्शन करण्यावरच भर देत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही राजकीय पुढाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचेही वयोवृद्ध शेतकरी सांगतात. मागील वर्षी सोयाबीनचा एकरी पाच ते सहा पोत्याचा उतारा आला होता. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे तीन ते चार पोती असाच उतारा येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकºयांकडून वर्तविला जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.उघाड ठरेल नवसंजीवनीजिल्ह्यातील ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून होत असलेला मुसळधार पाऊस यामुळे सध्या सोयाबीनच्या शेंगा पाहिजे त्या प्रमाणात भरल्या नसल्याचे शेतकरी सांगतात. पुढील आठ दिवस ढगाळी वातावरण हटून जिल्ह्यात उघाड राहिल्यास सोयाबीन पिकाला नवसंजीवनीच मिळेल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.कार्यालयात बसून केले जातोय सर्वेक्षण?कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यालयात बसूनच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करीत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी