‘तो’ साधतो गीत गायनातून राष्ट्रीय एकात्मता

By Admin | Updated: January 13, 2015 23:05 IST2015-01-13T23:05:21+5:302015-01-13T23:05:21+5:30

राष्ट्रप्रेम व देशभक्ती व्यक्त करण्यासाठी शिक्षण जात आणि धर्म कधीही अडसर ठरू शकत नाही. त्यासाठी पाहिजे फक्त आंतरीक इच्छा आणि सातत्याचा प्रामाणिक प्रयत्न. या प्रामाणिक

National integration through 'He' | ‘तो’ साधतो गीत गायनातून राष्ट्रीय एकात्मता

‘तो’ साधतो गीत गायनातून राष्ट्रीय एकात्मता

कारंजा (घा.) : राष्ट्रप्रेम व देशभक्ती व्यक्त करण्यासाठी शिक्षण जात आणि धर्म कधीही अडसर ठरू शकत नाही. त्यासाठी पाहिजे फक्त आंतरीक इच्छा आणि सातत्याचा प्रामाणिक प्रयत्न. या प्रामाणिक प्रयत्नातूनच तालुक्यातील ठाणेगाव येथील बारावी शिकलेल्या आणि शिवणकामाच्या व्यवसाय करणाऱ्या सुरेश मलवे याने सिद्ध करून दाखविले आहे. त्याच्या अंगी असलेल्या गायानाच्या कलेतून तो देशभक्तीपर गीत सादर करून राष्ट्रीय एकात्मिकतेचा प्रयत्न करीत आहे.
१९९९ पासून तर आजपर्यंतच्या १५ वर्षांच्या काळात त्याने वर्धा, नागपूरख अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रगान या सदराखाली १,५०० कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी आणि जनतेत देशप्रेम, देशभक्ती आदि भावना तेवत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या कार्यक्रमात ते वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा अभिनय आणि पहाडी आवाजात स्वरचित गितांच्या माध्यमातून देशभक्ती साक्षरता व्यसनमुक्ती, स्त्रीभू्रणहत्या, एड्स माणसानी माणूस जागृत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, हुंडाबळी या सर्व ज्वलंत समस्यांवर अत्यंत तळमळीने समाजप्रबोधन करीत आहे.
तिरंगा, याद करो कुर्बानी हे राष्ट्रभक्तीपर गिताचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. २००१ मध्ये फुले, शाहू, आंबेडकरी साहित्य संमेलनातही त्याने काव्य सादर केले. फिरत्या मोबाईल व्हॅन मधून न्याय आपुल्या दारी या कार्यक्रमांतर्गत कलापथकाद्वारे जनजागृती केली. महाराष्ट्र लोककला संघ वर्धा सभासद म्हणून काम करतो आहे. सन २०१४ येथील राज्यस्तरीय संमेलनात स्वरचित देशभक्तांला काव्य सादर केल्याबद्दल, त्याचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. यासह विविध कार्यक्रमात त्याचा सत्कार झाला आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: National integration through 'He'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.