शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

नाफेडला विकलेल्या तुरीचे चुकारे नाही; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:26 AM

नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : नाफेडला तुरी विकून दोन महिन्यांचा काळ लोटला तरी शासनाकडून चुकारा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळेवरची आर्थिक अडचण तर भागली नाहीच; मात्र खुल्या बाजारात तुरीने सहा हजारांवर उसळी घेतल्याने आर्थिक नुकसान झाले. चाळणीतून पडलेल्या बारीक तुरी मातीमोल भावाने विकण्याची पाळी तुर उत्पादकांवर आली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकला तर त्याचा चुकारा ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांना द्यावा, असा शासनाचा दंडक नव्हे, स्पष्ट नियम आहे. खासगी व्यापाऱ्यांनी तो पाळावा, अशी त्यांच्यावर सक्ती असते. मात्र शासनाकडूनच वर्षानुवर्षापासून नियम पायदळी तुडविला जात आहे. गतवर्षी शासनाने नाफेड या संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या तुरी खरेदी केल्या. त्याचे पैसे सहा महिन्यांपर्यंत दिले नाही. मागीलवर्षी खुल्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने शासनाला मोठ्या प्रमाणात तुरी खरेदी कराव्या लागल्या. त्यामुळे चुकारे विलंबाने मिळालेत. हे अन्यायकारी असले तरी समजण्यासारखे होते. यावेळी मात्र दुष्काळाच्या निकषावर शासनाने केवळ एकरी अडीच क्विंटल एवढ्या कमी तुरी घेतल्या. खुल्या बाजारात लवकरच तुरीचे भाव हमीभावाच्या आसपास आल्याने शिवाय चाळणीच्या जाचक अटीमुळे अनेक तूर उत्पादकांनी शासनाला तुरी विकण्यापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना विकून आर्थिक अडचण भागविली. ज्यांनी आपल्या तुरी नाफेडला विकल्या, त्यांना चुकारा न मिळाल्याने त्यांची मात्र आर्थिक अडचण कायम आहे. खुल्या बाजारात भाव सहा हजारांवर गेल्याने शेतकऱ्यांचे प्रती क्विंटल पाचशेच्यावर नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर आणूच नये ही नकारात्मकता केंद्रावरील अधिकाऱ्यांनी जोपासल्याने चाळणीतून जास्तीत जास्त तुरी खाली कशा पडतील, अशा हमालांना गुप्त सूचना दिल्याने चाळणीतून पडलेल्या तुरी अनेक शेतकऱ्यांनी तेथेच खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने विकाव्या लागल्या. कित्येक शेतकऱ्यांना तुरी जनावरांना खाऊ घालाव्या लागल्या. एवढ्या कमी प्रमाणात व दर्जेदार तुरी खरेदी केल्यावर दोन-दोन महिने चुकारे मिळू नये, ही शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. चुकारे मिळतील, तेव्हा विलंबाच्या कालावधीचे व्याज देणार नाही, ही बाब तूर उत्पादकांवर अन्याय करणारी आहे. एकंदरीत शेतकऱ्यांवर अन्याय करताना कोणतीच कसर ठेवायची नाही, तरीही त्याला जगाचा पोशिंदा म्हणून कोरडी सद्भावना दाखवायची हाच अनुभव असतो, हे मात्र खरे!

२५ मार्च २०१९ ला आर्वी केंद्रावर नाफेडला तुरी विकल्या. अद्याप चुकारा मिळाला नाही. चाळणीमुळेही बऱ्याच तुरी घरी आणाव्या लागल्या, तर आता बाहेरचे भाव वाढल्याने तिहेरी नुकसान झाले.- बाळा राऊत, शेतकरी रोहणा .

टॅग्स :agricultureशेती