शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नळ नसेल तर पोहोचतो नगरपालिकेचा टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:42 IST

शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । खासगी टँकरचे दर हजारापासून सतराशे रुपयांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात १९ प्रभाग असून वर्धा शहराला धाम नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नालवाडी गावाजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेने १९ प्रभागांसाठी आठ टँकर सुरू केले आहेत. ‘लोकमत’ने शनिवारी सकाळी ‘टँकरवारी’चा आढावा घेतला. ज्या भागात नळाचा पाणीपुरवठा १० दिवसानंतर होत आहे, त्या भागातील वॉर्ड व प्रभागात टँकर पाठविला जातो. या भागातील नागरिकांनी आपल्या घरासमोर प्लास्टिक ड्रम ठेवलेले आहेत. प्रत्येक घराला १ ड्रम याप्रमाणे पाणी वाटप नगरपालिकेचा टँकर करतो, असे दिसून आले. नगरपालिकेचा टँकर आल्यावर काही भागात नगरसेवक टँकरसोबत असल्याचेही दिसून आले. वॉर्डातील प्रत्येक भागात नागरिकाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न असल्याचे नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले तर शहराला पाणी पुरवठा होईल आणि टँकर बंद होतील, अशी माहिती मिळाली. शहरातील गोंड प्लॉट, केजाजी चौक या भागात एप्रिल महिन्यापासून प्रदीप तलमले मित्र परिवार असा फलक लावलेला टँकर नागरिकांना पाणीपुरवठा करीत असल्याचे दिसून आले. गांधीनगर भागात गेल्या आठवडाभरापासून नळ आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात टँकर आला तरी एकच ड्रम पाणी दिले जाते. हे अपुरे असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्यासाठी नागरिकांची प्रचंड ओरड होत आहे.सिंदी (मेघे) येथे सहा वॉर्डांकरिता एकच टँकरवर्धा शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतींच्या हद्दीत सहा वॉर्डाला एक टँकर पाणी पुरवठा करीत आहे. त्यामुळे दिवसभरात टँकर कधीही कोणत्याही भागात येऊन धडकतो. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना दिवसभर टँकरची प्रतीक्षा करावी लागते. लोकमतची चमू ज्यावेळी गावात गेली, त्यावेळी वॉर्ड क्र.३ वॉर्ड क्र.२ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. बरेचजण ड्रममध्ये पाणी साठवून ठेवत असल्याचे दिसून आले. टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.चौथ्या माळ्यावर पाणी हवे, द्या सतराशे!वर्धा शहरातील पाणी पुरवठ्याचा लोकमतने शनिवारी आढावा घेतला. दरम्यान, दुपारी १२.३० वाजता लोकमत चमू शहरातील बाजारपेठेत पोहोचली. यावेळी हिरालाल रामप्रकाश या कापड दुकानाच्या बाजूला पारस आईस फॅक्टरीसमोर कार्यालय असलेल्या एका टँकर मालकाचा टँकर पाणीपुरवठा करताना दिसला. या ठिकाणी लोकमतने चौकशी केली तर पहिल्या ते चौथ्या माळ्यापर्यंत पाणी चढवून द्यायचे असेल तर सतराशे रुपये घेतले जातात. खालीच पाणी उतरवायचे असेल तर १ हजार रुपयाला टँकर दिला जातो. आपल्यालाही हवा असेल तर आमच्या कार्यालयात संपर्क साधा, असे या ट्रॅक्टरच्या चालकाने सांगितले. आमच्याकडे दिवसभर जे लोक टँकर बुक करतात, त्यांना आम्ही पाणीपुरवठा करतो, असे ते म्हणाले.मुस्लिमबहुल भागात पाणी वाटपात पक्षपातवर्धा शहराच्या महादेवपुरा येथील प्रभाग क्र.५ आणि ६ मध्ये नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या भागात पाणीपुरवठा करताना पक्षपात केला जात असल्याची तक्रार नगरपालिकेचे बांधकाम सभापती व नगरसेवक नौशाद शेख यांनी लोकमतकडे केली आहे. या भागात बहुतांश मुस्लिम बांधव रहिवासी आहेत. त्यांचे सध्या रोजे सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. शिवाय त्यांना वेळेत पाणी मिळणेही गरजेचे आहे. असे असताना या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक येऊन ड्रमचे-ड्रम पाणी घेऊन जात आहे. यावर कुणाचाही अंकुश नाही, अशी माहिती नौशाद शेख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई